शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी! दोन जिल्ह्यांतील ३० लोक वाहून गेले, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 08:30 IST

केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने चार गावे गाडली गेली आहेत. तर त्याच्या दोन दिवसांनी हिमाचल प्रदेशमध्ये मोठी घटना घडली आहे.

केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने चार गावे गाडली गेली आहेत. आतापर्यंत २५६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप अनेक लोक मातीखाली अडकले आहेत. असे असताना तिकडे हिमाचल प्रदेशमधून धक्कादायक बातमी येत आहे. 

शिमल्यापासून १०० किमी दूर असलेल्या रामपूरच्या झाकडी आणि मंडी जिल्ह्यातील राजवन गावावर प्रचंड ढगफुटी झाली आहे. या पावसामुळे अचानक पूर आला आणि या पाण्यात सुमारे तीस जण वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. रामपूरचे उपायुक्त अनुपम कश्यप यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच तातडीने एसडीआरएफची टीम रवाना करण्यात आली आहे. तसेच पोलीस, रेस्क्यू टीम देखील पोहोचली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ढगफुटीमध्ये १९ लोक बेपत्ता झाले आहेत. 

रामपूरचे एसडीएम निशांत तोमर यांना रस्ते बंद असल्याने तुकडीसह सर्व यंत्रणा घेऊन दोन किमी पायपीट करावी लागली आहे. दुसरीकडे मंडीच्या द्रंग विधानसभा क्षेत्रातील धम्चयाण पंचायतच्या राजवन दावावरही ढगफुटी झाली आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक घरे पाण्याच्या वेगामुळे वाहून गेली आहेत. यामध्ये ११ पेक्षा अधिक लोक बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. 

या भागातील सरकारी अधिकाऱ्यांशी देखील संपर्क होत नाहीय. मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. तसेच रस्ते देखील उखडले गेले आहेत. उपायुक्त मंडी अपूर्व देवगन घटनास्थळी रवाना झाले आहेत. बुधवारी रात्री १२ च्या सुमारास मोठा आवाज झाला आणि पाहता पाहता सर्व भागात पाणी घुसले. काही समजायच्या आत लोक यात वाहून गेले, असे तेथील रहिवाशांनी सांगितले. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशRainपाऊस