शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 06:56 IST

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धरालीमध्ये मोठे नुकसान; लष्करी छावणीही वाहून गेली...

डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात धरालीमध्ये ढगफुटीमुळे जवळील खीरगंगा नदीला आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने प्रचंड नुकसान झाले असून, अनेक लोक बेपत्ता आहेत. या पुरात २० ते २५ हॉटेल व होम स्टे वाहून गेल्याचे वृत्त आहे. प्रारंभिक आकडेवारीनुसार चौघांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने म्हटले असले तरी या भागातील परिस्थिती इतकी गंभीर आहे की मनुष्यहानी किंवा वित्तहानीची आकडेवारी इतक्यात स्पष्ट होणे शक्य नाही.

या आपत्तीमध्ये मृतांचा अधिकृत आकडा समोर आला नसला तरी प्रचंड मनुष्यहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कारण, या भागात हॉटेल आणि होम स्टेमध्ये राहणाऱ्यांची संख्या खूप असते. त्यामुळे नेमके किती लोक पुरात व चिखलात दबले गेले आहेत हे कळणे तूर्त अशक्य असल्याचे स्थानिक सूत्रांनी म्हटले आहे.

गंगोत्री यात्रा मार्गावरील प्रमुख ठिकाण असलेल्या धरालीमध्ये अनेक हॉटेल्स व होम स्टेमध्ये यात्रेकरूंची वर्दळ असते. मंगळवारी नदीच्या पाणलोट क्षेत्रातच ढगफुटी झाल्याने अचानक महापूर आला. यात वाहून आलेली माती व दगड-खडीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले.

दरम्यान, उत्तराखंडमध्ये जागोजागी डोंगरी भागात पावसामुळे गंगोत्री मार्गावर डोंगरांवरून वाहून आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे रस्ते जाम झाले आहेत. अनेक भागांत मदत व बचाव पथकेच अडकून पडली आहेत. हर्षिल भागात हेलिपॅड वाहून गेले असून, लष्कराची छावणीही पाण्यात गेली आहे.

या ठिकाणी आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. बचाव पथके, लष्कर देखील सतत बचाव कार्य करत आहे. आतापर्यंत १३० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे.

अचानक पाण्याचा-दगडांचा आवाज आला अन्...मुखबा गावचे प्रत्यक्षदर्शी सुभाषचंद्र सेमवाल सांगतात, दुपारी आम्ही घरात विश्रांती घेत असताना अचानक पाण्याचा खळखळाट आणि दगडांचे आवाज ऐकू आले. काही कळायच्या हॉटेल आणि इमारती या पाण्याचे कवेत घेतल्या.हे पाणी धरालीच्या दिशेने येत असल्याचे दिसताच आम्ही लोकांना सावध करण्यासाठी शिट्या वाजवणे सुरू केले, ओरडून या लोकांना लांब जाण्यास सांगितले. काही लोक हॉटेलमधून बाहेर पडून पळाले. परंतु, पाहता पाहता कित्येक घरे, लोक पुरात वाहून गेले.

आठ ते १० जवान बेपत्ता?या घटनेत हर्शिल भागातील छावणी परिसरातून भारतीय लष्कराचे आठ ते १० जवान बेपत्ता असल्याचे समजते. लष्कराचे जवान बेपत्ता झालेले असतानाही, लष्कराचे इतर जवान लोकांसाठी मदत-बचाव कार्य करण्यास सरसावले आहेत, असे भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

सर्वपक्षीय आवाहन...पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या नैसर्गिक आपत्तीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, यात दगावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांबाबत संवेदना व्यक्त केली आहे. शाह यांनी या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेऊन मदतीचे आदेश दिले.

‘त्या’ भयंकर आठवणी...१६ जून २०१३ रोजी रात्री केदारनाथमध्ये आलेल्या अशाच आपत्तीत बेपत्ता ३०७५ लोकांचा आजही थांगपत्ता लागलेला नाही. याशिवाय ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी साडेदहा वा. ऋषिगंगा नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे विद्युत प्रकल्पाच्या कामाचे प्रचंड नुकसान झाले. या आपत्तीमध्ये बोगद्यात अडकलेले ११७ मृतदेह सापडले. परंतु, अजूनही ८९ जणांचे मृतदेह सापडू शकले नाही. उत्तराखंडमधील मंगळवारच्या आपत्तीमुळे या भयंकर आठवणी ताज्या झाल्या. 

टॅग्स :floodपूरSoldierसैनिक