शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘जीवन सरल’ पॉलिसीची विक्री बंद करा, सुप्रीम कोर्टात याचिका, ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 05:35 IST

गुंतवणुकदारांना सुजाण करण्याचे काम करणाऱ्या मुंबईतील ‘मनीलाईफ फौंडेशन’ने केलेली ही याचिका गुरुवारी प्रथमच सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे आली.

नवी दिल्ली: भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे विकली जाणारी ‘जीवन सरल’ पॉलिसी लाभ देण्याऐवजी तोटा करून ग्राहकांची फसवणूक करणारी असल्याने या पॉलिसीची विक्री तात्काळ बंद करण्याचा आदेश द्यावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.गुंतवणुकदारांना सुजाण करण्याचे काम करणाऱ्या मुंबईतील ‘मनीलाईफ फौंडेशन’ने केलेली ही याचिका गुरुवारी प्रथमच सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे आली. मात्र याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांच्या विनंतीवरून सुनावणी १५ जुलै रोजी ठेवण्यात आली. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, पॉलिसीधारकाने ‘जीवन सरल’ पॉलिसीचे हप्ते १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ भरले तरी त्याला परत मिळणारी रक्कम भरलेल्या रकमेहूनही कमी असते. काही लोक गुंतवणूक म्हणून ही पॉलिसी उतरवीत असले तरी भरलेले पैसेही परत न देऊन आयुर्विमा महामंडळ ग्राहकांची फसवणूक करत आहे.याचिकाकर्त्यांचे असेही म्हणणे आहे की, आयुर्विमा महामंडळाने पुरेशी काळजी न घेता या पॉलिसीची रचना केली आहे आणि चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन महामंडळ ही पॉलिसी ग्राहकांच्या गळ््यात मारत आहे. आत्तापर्यंत महामंडळाने ही फसवी पॉलिसी विकून ७५ हजार ते एक लाख कोटी रुपये गोळा केले आहेत.यासाठी करण्यात आली याचिकाखरे तर अशी पॉलिसी बाजारात विकून न देण्याचे विमा विकास व नियामक प्राधिकरणास (इरडा) अधिकार आहेत. परंतु तक्रारी करूनही त्यांनी काही केले नाही. प्रत्येक पॉलिसीधारकास याविरुद्ध दाद मागणे शक्य नसल्याने ही प्रातिनिधिक याचिका करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय