शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

राजीव गांधींच्या क्रांतीच्या पायावर प्रसिद्धीचा कळस

By admin | Updated: May 19, 2015 01:47 IST

राजीव गांधी यांनी भारतात संगणक युगाचा प्रारंभ केला. नरसिंह राव यांनी दूरसंचार क्रांती आरंभली.

नितीन अग्रवाल - नवी दिल्लीराजीव गांधी यांनी भारतात संगणक युगाचा प्रारंभ केला. नरसिंह राव यांनी दूरसंचार क्रांती आरंभली. काँग्रेसच्या नेत्यांनी रचलेल्या याच पायावर उत्तम प्रयोग करून नरेंद्र मोदींनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. वर्षभराच्या सत्तेच्या काळात ते व्हर्च्युअल वर्ल्डचे जणू सुपर स्टार बनले आहेत. सरकारची वर्षभराची कारकीर्द जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीही हे माध्यम अतिशय प्रभावीपणे त्यांनी वापरले.मोदींनी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यासोबत ‘सेल्फी’ काढली तेव्हा संपूर्ण जग अवाक् झाले. सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या नेत्यांचा देश असलेल्या चीनपासून अमेरिकेपर्यंतच्या ‘व्हर्च्युअल वर्ल्ड’मध्ये या ‘सेल्फी’ची जोरदार चर्चा झाली. चीन दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोदी चीनी सोशल मीडिया ‘वीबो’वर येतात. जपान दौऱ्यापूर्वी जपानी भाषेत टिष्ट्वट करतात. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ते मीडियाचा नाही तर सोशल मीडियाचा वापर करतात. चीनमध्ये त्यांचे भव्यदिव्य स्वागत असो वा टेराकोटा म्युझियमधील छायाचित्रे अशी क्षणाक्षणाची माहिती मोदींनी सोशल मीडियावर ‘शेअर’ केली. मंगोलियामध्ये पोहोचल्यावरही त्यांनी आपली ‘सेल्फी’सोशल मीडियावर टाकली. कधी छत्तीसगडच्या दंतेवाडा येथील मुलांसोबतच्या जुगलबंदीचा व्हिडिओ तर कधी ‘मन की बात’ कार्यक्रमाबाबतचा मोदींचा संदेश टिष्ट्वटरवर पडतो. भूकंपप्रभावित नेपाळीची मदत असो, पाकिस्तानी क्रिकेट संघाला शुभेच्छा असो, स्वच्छ भारत अभियान वा जनधन योजना असो, पंतप्रधानांनी या प्रत्येक बाबीसाठी सोशल मीडियाचा वापर केला. सोशल मीडियाची शिडी चढून केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगात त्यांची लोकप्रियतेचे शिखर गाठले. च्सोशल मीडियाद्वारे लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासोबतच मोदींना यामुळे अनेक वादांनाही तोंड द्यावे लागले. वडोदरा येथे मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर कमळ या निवडणूक चिन्हासोबत काढलेल्या ‘सेल्फी’ने त्यांनी वाद ओढवून घेतला. च्स्वत:चे नाव कोरलेला सूट परिधान केल्यावरून ते टीकेचे धनी ठरले. केवळ विरोधकच नाही तर त्यांचे ‘व्हर्च्युअल फ्रेंड्स’ आणि ‘फॉलोअर्स’नी त्यांच्यावर तीव्र ताशेरे ओढले. टिष्ट्वटरवरून शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे त्यांनी केलेले आवाहन असो वा सानिया मिर्झाविरूद्ध त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांच्या अभ्रद विधानांवर त्यांनी साधलेली चुप्पी असो यावरूनही मोदींवर प्रखर टीका झाली. मोदींवरील व्यंगात्मक आणि उपहासात्मक कमेंट्स, पोस्ट ,टिष्ट्वट्स आणि विनोद सोशल मीडियावर गाजले. मोदींना सोशल मीडियाचे सुपर स्टार बनविण्यामागे अनेक आयटी एक्सपर्ट(माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ)चा हात आहे. पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत टिष्ट्वटर हँडल असो वा त्यांचे यूट्युब चॅनल, प्रत्येक माध्यमातून मोदींचे संदेश विजेच्या गतीने जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तज्ज्ञांची ही टीम कमालीची दक्ष असते. साहजिकच मोदींचे हॅशटॅग काही क्षणांत ट्रेंड करायला लागतात.राजीव गांधी यांनी भारतात संगणक युगाचा प्रारंभ केला. राजीव गांधी यांनी सॅम पिट्रोडांच्या मदतीने पाहिलेल्या स्वप्नवत दूरसंचार क्रांतीला नरसिंह राव यांनी रूप दिले. मोदींनी या पायाचा उत्तम वापर करून सत्तेचे शिखर गाठले.