शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता क्रमवारीत नवी मुंबई राज्यात पहिली, देशात तिसरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 06:07 IST

बृहन्मुंबईने ४९ वरून ३५, पुण्याने ३७ वरून १५, तर नागपूरने ५८ वरून १८ अशी प्रगती केली.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने केलेल्या देशभरातील चार हजारांहून अधिक शहरांच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’मध्ये महाराष्ट्रातील एकूण ५६ शहरांनी विविध प्रकारच्या वर्गवारीत पहिल्या १०० शहरांमध्ये स्थान पटकावले. देशातील सर्वात स्वच्छ १०० शहरांच्या क्रमवारीत नवी मुंबई, चंद्रपूर, धुळे आणि नाशिक या शहरांनी गतवर्षीच्या तुलनेत मोठी मुसंडी मारून चांगले यश संपादित केले. गतवर्षी देशात सातव्या स्थानावर राहिलेल्या नवी मुंबईने यंदा राज्यात पहिला क्रमांक मिळवत देशात तिसरे स्थान पटकाविले. तर चंद्रपूरने २९ पासून ९ तर नाशिकने ६७ पासून २३ क्रमांक अशी प्रगती केली. गेल्या वर्षी १०० व्या स्थानावर राहिलेल्या धुळे शहराने यंदा १८ व्या स्थानापर्यंत मारलेली उडी विशेष लक्षणीय आहे. मुंबई, पुणे व नागपूर या शहरांनाही क्रमवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वरचे स्थान मिळविले. बृहन्मुंबईने ४९ वरून ३५, पुण्याने ३७ वरून १५, तर नागपूरने ५८ वरून १८ अशी प्रगती केली.दिल्लीत व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या ‘स्वच्छता महोत्सव’ या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण’चे निकाल जाहीर केले. तसेच विविध वर्गवारीतील विजेतेही जाहीर केले गेले. देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान लाागोपाठ चौथ्या वर्षी पटकावून इंदूरने विक्रम केला. सूरतची दुसऱ्या तर नवी मुंबईची देशपातळीवर तिसºया क्रमांकासाठी निवड झाली.गतवर्षी एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरांच्या क्रमवारीत पहिल्या १०० स्थानांमध्ये महाराष्ट्रातील २८ शहरे होती. यंदा ही संख्या वाढून ३६ झाली. मात्र, एक लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत रज्याची खूप मोठी अधोगती झाली. गेल्या वर्षी अशा १०० शहरांमध्ये राज्यातील तब्बल ६० शहरे होती. यंदा मात्र जेमतेम २० शहरे त्यात स्थान मिळवू शकली.>१ लाखाहून कमी लोकसंख्येची शहरे: कराड (१), सासवड (२), लोणावळा (३), पन्हाळा (५), जेजुरी (६), शिर्डी (७), मौदा कॅन्टोनमेंट (८), कागल (९), रत्नागिरी (१०), ब्रह्मपुरी (११), वडगाव (१२), गडहिंग्लज (१३), इंदापूर (१४), देवळाली प्रवरा (१५), राजापूर (१६), विटा (१७), मुरगुड (१८), नरखेड (२३), माथेरान (२४) आणि मलकापूर (२५).>कॅन्टोनमेंटबोर्डांची क्रमवारीदेहूरोड (८), अहमदनगर (१२), खडकी (१५), पुणे (२५), औरंगाबाद (२९), काम्पटी (४६) आणि देवळाली (५२).100हून अधिक नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसरा.

इंदूर सलग चौथ्यांदा सर्वांत स्वच्छ शहरइंदूरने सलग चौथ्यांदा भारतात सर्वांत स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला आहे. सुरत दुसऱ्या तर नवी मुंबई तिसºया क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत प्रतिनिधित्व करीत असलेले वाराणसी शहर सर्वोत्तम गंगा शहर ठरले आहे. त्या पाठोपाठ कानपूर, मुंगेर, प्रयागराज, हरिद्वार ही शहरे आहेत.>विविध शहरांची क्रमवारीस्पर्धेच्या विविध गटांमध्ये पहिल्या100मध्ये स्थान मिळविणारी राज्यातीलशहरे व त्यांची क्रमवारी(कंसात) :चंद्रपूर (४)धुळे (९)अंबरनाथ (१८)मिरा-भार्इंदर (१९)पनवेल (२०)जालना (२२)भिवंडी-निजामपूर (२६)कोल्हापूर (३२)सांगली (३६)अमरावती (३७)बार्शी (३८)अहमदनगर (४०)नंदुरबार (४१)भुसावळ (४६)कुळगाव-बदलापूर (४७)उदगीर (५५)वर्धा (५९)नांदेड-वाघाळा (६०)सातारा (६१)जळगाव (६४)अकोला (६६)सोलापूर (६७)परभणी (७०)यवतमाळ (८८)इचलकरंजी (८९)हिंगणघाट (९२)उल्हासनगर (९४)गोंदिया (१०४)अचलपूर (१०६)बीड (११०)उस्मानाबाद (१२७)मालेगाव (१३६)लातूर (१३७)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका