शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

स्वच्छता क्रमवारीत नवी मुंबई राज्यात पहिली, देशात तिसरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 06:07 IST

बृहन्मुंबईने ४९ वरून ३५, पुण्याने ३७ वरून १५, तर नागपूरने ५८ वरून १८ अशी प्रगती केली.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने केलेल्या देशभरातील चार हजारांहून अधिक शहरांच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’मध्ये महाराष्ट्रातील एकूण ५६ शहरांनी विविध प्रकारच्या वर्गवारीत पहिल्या १०० शहरांमध्ये स्थान पटकावले. देशातील सर्वात स्वच्छ १०० शहरांच्या क्रमवारीत नवी मुंबई, चंद्रपूर, धुळे आणि नाशिक या शहरांनी गतवर्षीच्या तुलनेत मोठी मुसंडी मारून चांगले यश संपादित केले. गतवर्षी देशात सातव्या स्थानावर राहिलेल्या नवी मुंबईने यंदा राज्यात पहिला क्रमांक मिळवत देशात तिसरे स्थान पटकाविले. तर चंद्रपूरने २९ पासून ९ तर नाशिकने ६७ पासून २३ क्रमांक अशी प्रगती केली. गेल्या वर्षी १०० व्या स्थानावर राहिलेल्या धुळे शहराने यंदा १८ व्या स्थानापर्यंत मारलेली उडी विशेष लक्षणीय आहे. मुंबई, पुणे व नागपूर या शहरांनाही क्रमवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वरचे स्थान मिळविले. बृहन्मुंबईने ४९ वरून ३५, पुण्याने ३७ वरून १५, तर नागपूरने ५८ वरून १८ अशी प्रगती केली.दिल्लीत व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या ‘स्वच्छता महोत्सव’ या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण’चे निकाल जाहीर केले. तसेच विविध वर्गवारीतील विजेतेही जाहीर केले गेले. देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान लाागोपाठ चौथ्या वर्षी पटकावून इंदूरने विक्रम केला. सूरतची दुसऱ्या तर नवी मुंबईची देशपातळीवर तिसºया क्रमांकासाठी निवड झाली.गतवर्षी एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरांच्या क्रमवारीत पहिल्या १०० स्थानांमध्ये महाराष्ट्रातील २८ शहरे होती. यंदा ही संख्या वाढून ३६ झाली. मात्र, एक लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत रज्याची खूप मोठी अधोगती झाली. गेल्या वर्षी अशा १०० शहरांमध्ये राज्यातील तब्बल ६० शहरे होती. यंदा मात्र जेमतेम २० शहरे त्यात स्थान मिळवू शकली.>१ लाखाहून कमी लोकसंख्येची शहरे: कराड (१), सासवड (२), लोणावळा (३), पन्हाळा (५), जेजुरी (६), शिर्डी (७), मौदा कॅन्टोनमेंट (८), कागल (९), रत्नागिरी (१०), ब्रह्मपुरी (११), वडगाव (१२), गडहिंग्लज (१३), इंदापूर (१४), देवळाली प्रवरा (१५), राजापूर (१६), विटा (१७), मुरगुड (१८), नरखेड (२३), माथेरान (२४) आणि मलकापूर (२५).>कॅन्टोनमेंटबोर्डांची क्रमवारीदेहूरोड (८), अहमदनगर (१२), खडकी (१५), पुणे (२५), औरंगाबाद (२९), काम्पटी (४६) आणि देवळाली (५२).100हून अधिक नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसरा.

इंदूर सलग चौथ्यांदा सर्वांत स्वच्छ शहरइंदूरने सलग चौथ्यांदा भारतात सर्वांत स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला आहे. सुरत दुसऱ्या तर नवी मुंबई तिसºया क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत प्रतिनिधित्व करीत असलेले वाराणसी शहर सर्वोत्तम गंगा शहर ठरले आहे. त्या पाठोपाठ कानपूर, मुंगेर, प्रयागराज, हरिद्वार ही शहरे आहेत.>विविध शहरांची क्रमवारीस्पर्धेच्या विविध गटांमध्ये पहिल्या100मध्ये स्थान मिळविणारी राज्यातीलशहरे व त्यांची क्रमवारी(कंसात) :चंद्रपूर (४)धुळे (९)अंबरनाथ (१८)मिरा-भार्इंदर (१९)पनवेल (२०)जालना (२२)भिवंडी-निजामपूर (२६)कोल्हापूर (३२)सांगली (३६)अमरावती (३७)बार्शी (३८)अहमदनगर (४०)नंदुरबार (४१)भुसावळ (४६)कुळगाव-बदलापूर (४७)उदगीर (५५)वर्धा (५९)नांदेड-वाघाळा (६०)सातारा (६१)जळगाव (६४)अकोला (६६)सोलापूर (६७)परभणी (७०)यवतमाळ (८८)इचलकरंजी (८९)हिंगणघाट (९२)उल्हासनगर (९४)गोंदिया (१०४)अचलपूर (१०६)बीड (११०)उस्मानाबाद (१२७)मालेगाव (१३६)लातूर (१३७)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका