शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

स्वच्छ भारत : कॅगने केला खोटेपणा उघड; मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 02:51 IST

२0१४ ते २0१७ या काळात आठ जिल्ह्यांतील १२0 ग्रामपंचायतींकडून माहिती मागविली असता २९ टक्के परिवारांकडे शौचालये नसल्याचे उघडकीस आले आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाच्या दाव्यातील खोटेपणा कॅगने उघडकीस आणला आहे. आपल्या ताज्या अहवालात कॅगने म्हटले की, २0१४ ते २0१७ या काळात आठ जिल्ह्यांतील १२0 ग्रामपंचायतींकडून माहिती मागविली असता २९ टक्के परिवारांकडे शौचालये नसल्याचे उघडकीस आले आहे.कॅगने म्हटले की, या २९ टक्के परिवारांचे सदस्य मोकळ्या मैदानात अथवा रस्त्याच्या बाजूला शौचाला बसतात. कारण या गावांत सार्वजनिक शौचालयेही उपलब्ध नाहीत. ही गुजरातमधील स्थिती आहे.दुसरीकडे वॉटर अँड प्रेक्सिस इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट स्टडीजच्या अहवालात राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील खोटेपणा उघड केला गेला आहे. या राज्यांनी ज्या गावांना हगणदारीमुक्त गावे म्हणून घोषित केले होते, त्यापैकी फक्त एक गाव हगणदारीमुक्त झाल्याचे आढळून आले. सात गावांबाबतचा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चच्या सर्वेक्षणात राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यातील हगणदारीमुक्त गावांचे दावेही खोटे असल्याचे आढळून आले. यातील फक्त एक गाव हगणदारीमुक्त झाल्याचे आढळून आले.काँग्रेसचा हल्लाबोलमाजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी सांगितले की, २0१६-१७ मध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी ग्रामविकास मंत्रालयाने १४ हजार कोटींची मागणी केली होती.केंद्र सरकारने केवळ ९ हजार कोटी रुपये दिले. मंत्रालयाच्या नाराजीनंतर हा आकडा १0,५00 कोटी करण्यात आला.- २0१८ पर्यंत राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ९,८९0 कोटी रुपये खर्चच झालेले नाहीत. त्यामुळे बिगर सरकारी संस्था आक्षेप नोंदवीत आहेत. साधे पिण्याचे पाणीही सरकार पुरवू शकलेले नाही.- सरकार जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. प्रत्यक्ष काम मात्र होताना दिसत नाही. जाहिरांतीऐवजी सरकारने कामावर पैसे खर्च केले असते, तर ही स्थिती उद्भवली नसती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी