शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

आंध्र प्रदेशमध्ये  YSR काँग्रेस आणि TDPच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, दगडफेक, वाहने, घरे जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 10:36 IST

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमधील पलनाडू जिल्ह्यामध्ये शुक्रवारी जगनमोहन रेड्डी सत्तारूढ पक्ष वायएसआर काँग्रेस आणि विरोधी पक्ष चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी टीडीपी नेत्यांची घरे, वाहनांना आग लावण्यात आली.

गुंटूर - आंध्र प्रदेशमधील पलनाडू जिल्ह्यामध्ये शुक्रवारी जगनमोहन रेड्डी सत्तारूढ पक्ष वायएसआर काँग्रेस आणि विरोधी पक्ष चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी टीडीपी नेत्यांची घरे, वाहनांना आग लावण्यात आली. या हिंसाचारानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बलप्रयोग करावा लागला. दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीमध्ये अनेक सर्वसामान्य नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. टीडीपीने आपल्या नेत्यांवर आणि पक्ष कार्यालयावर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.

पलनाडूचे एसपी रविशंकर रेड्डी यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, या परिसरामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आता स्थिती नियंत्रणात आली आहे. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक आमदार पिनेली रामकृष्ण रेड्डी यांचे भाऊ वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचारावेळी तिथे उपस्थित होते. वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टीडीपीच्या कार्यकर्त्यांच्या दुकानांचीही जाळपोळ करण्यात आली, असा आरोप टीडीपी नेते वेंकटरामी रेड्डी यांनी केला आहे. यादरम्यान, स्थानिक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कुठलीही कारवाई केली नाही, असा आरोपही त्यांनी केली.

यादरम्यान, टीपीपी सरचिटणीस नारा लोकेश यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, वायएसआर काँग्रेसच्या जमावाने पोलिसांच्या पाठिंब्याने टीडीपीच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ला केला. हा प्रकार राज्यामध्ये अराजक निर्माण झाल्याचा पुरावा आहे. टीडीपीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या वायएसआर काँग्रेसच्या गुंडांना त्वरित अटक केली गेली पाहिजे. आम्ही जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेले नेते आणि कार्यकर्त्यांसोबत उभे आहोत.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुथ चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूरच्या डीआयजींशी संपर्क साधला आहे. तसेच मार्चलामध्ये परिस्थिती चिघळल्यावर पोलीस कारवाई करण्यात का अपयशी ठरले अशी विचारणा केली आहे.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीPoliticsराजकारण