शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

आंध्र प्रदेशमध्ये  YSR काँग्रेस आणि TDPच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, दगडफेक, वाहने, घरे जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 10:36 IST

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमधील पलनाडू जिल्ह्यामध्ये शुक्रवारी जगनमोहन रेड्डी सत्तारूढ पक्ष वायएसआर काँग्रेस आणि विरोधी पक्ष चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी टीडीपी नेत्यांची घरे, वाहनांना आग लावण्यात आली.

गुंटूर - आंध्र प्रदेशमधील पलनाडू जिल्ह्यामध्ये शुक्रवारी जगनमोहन रेड्डी सत्तारूढ पक्ष वायएसआर काँग्रेस आणि विरोधी पक्ष चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी टीडीपी नेत्यांची घरे, वाहनांना आग लावण्यात आली. या हिंसाचारानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बलप्रयोग करावा लागला. दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीमध्ये अनेक सर्वसामान्य नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. टीडीपीने आपल्या नेत्यांवर आणि पक्ष कार्यालयावर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.

पलनाडूचे एसपी रविशंकर रेड्डी यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, या परिसरामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आता स्थिती नियंत्रणात आली आहे. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक आमदार पिनेली रामकृष्ण रेड्डी यांचे भाऊ वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचारावेळी तिथे उपस्थित होते. वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टीडीपीच्या कार्यकर्त्यांच्या दुकानांचीही जाळपोळ करण्यात आली, असा आरोप टीडीपी नेते वेंकटरामी रेड्डी यांनी केला आहे. यादरम्यान, स्थानिक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कुठलीही कारवाई केली नाही, असा आरोपही त्यांनी केली.

यादरम्यान, टीपीपी सरचिटणीस नारा लोकेश यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, वायएसआर काँग्रेसच्या जमावाने पोलिसांच्या पाठिंब्याने टीडीपीच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ला केला. हा प्रकार राज्यामध्ये अराजक निर्माण झाल्याचा पुरावा आहे. टीडीपीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या वायएसआर काँग्रेसच्या गुंडांना त्वरित अटक केली गेली पाहिजे. आम्ही जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेले नेते आणि कार्यकर्त्यांसोबत उभे आहोत.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुथ चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूरच्या डीआयजींशी संपर्क साधला आहे. तसेच मार्चलामध्ये परिस्थिती चिघळल्यावर पोलीस कारवाई करण्यात का अपयशी ठरले अशी विचारणा केली आहे.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीPoliticsराजकारण