शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

NV Ramana: “वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष, दुसऱ्यांच्या चुका डॉक्टर भोगतायत”; CJI चे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 10:56 IST

NV Ramana: देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय क्षेत्राबाबत सरन्यायाधीशांचे परखड मतया क्षेत्राला सरकार प्राथमिकता देत नसल्याची खंतडॉक्टरांवर होत असलेल्या हल्लांबाबत व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली: गतवर्षी कोरोनाने भारतात शिरकाव केल्यापासून वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणेने अद्यापही उसंत घेतली नसल्याचे पाहायला मिळत आहे. डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी अविरत, अखंडपणे सेवा देत आहेत. मात्र, असे असूनही अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होताना दिसत आहे. यावर न्यायपालिकांनी वेळोवेळी सरकारची कानउघडणीही केली आहे. अशातच आता देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे. (cji nv ramana says centre govt not have serious concern about medical sector)

एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीशांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. सरकार वैद्यकीय क्षेत्राबाबत फार गंभीर असल्याचे चित्र नाही. याविषयावर सविस्तर चर्चा होणे महत्त्वाचे आहे, असेही सरन्यायाधीश रमणा यांनी म्हटले आहे. यापूर्वीही लोकशाही आणि निवडणुकांबाबत न्या. रमणा यांनी परखड भाष्य केले होते. 

“निवडणुका म्हणजे अत्याचार दूर होण्याची हमी नाही”: सरन्यायाधीश

ड्युटीवरील डॉक्टरांवर हल्ले चुकीचे

आपली सेवा देत ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांवर हल्ले होणे ही बाब अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आहे. दुसऱ्यांच्या चुका, त्यांचे नैराश्य याचे परिणाम डॉक्टरांना भोगावे लागत आहेत. या क्षेत्राला सरकारकडून प्राथमिकता मिळत नसल्याचेच पाहायला मिळत आहे, या शब्दांत न्या. रमणा यांनी अप्रत्यक्षरित्या सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एवढेच नव्हे तर हळूहळू फॅमिली डॉक्टर ही संकल्पना अस्ताला चालली आहे. कॉर्पोरेट आणि गुंतवणूकदार परिस्थितीचा फायदा घेत असून, यासाठी डॉक्टरांना का दोष दिला जातो, अशी विचारणा न्या. रमणा यांनी यावेळी केली आहे. 

 “कोरोनाचे कोणतेही व्हेरिएंट येऊ देत, ‘हे’ उपाय रामबाण ठरतील!”

निवडणुका, टीका आणि विरोध हे लोकशाहीचा भाग 

निवडणुका, टीका आणि विरोध ही लोकशाहीचा भाग आहेत. निवडणुकांच्या माध्यमातून तुमच्याकडे लोकप्रतिनिधी किंवा राज्यकर्त्यांना बदलण्याचा अधिकार असला, तरी त्यामुळे छळ, अत्याचार थांबतील वा दूर होतील याची हमी मिळू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या स्वाभिमानाचे संरक्षण होत नाही, तोपर्यंत लोकशाही अर्थपूर्ण होत नाही, असे न्या. रमणा यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. 

“अपहरण केलेल्याला चांगली वागणूक देणाऱ्या आरोपीला जन्मठेप देता येणार नाही”: सुप्रीम कोर्ट

दरम्यान, कोरोना साथीच्या स्वरुपात जगाने अभूतपूर्व संकट पाहिले. या संकटाच्या प्रसंगी लोकांच्या सुरक्षिततेसाठी आपण काय केले आहे, याचा विचार आपण स्वत: करायला हवा. या कोरोनामुळे आणखी संकटे उभी राहू शकतात. या परिस्थितीत काय योग्य केले आणि कोणत्या गोष्टी चुकीच्या ठरल्या, याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, असेही सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा म्हणाले होते.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयN V Ramanaएन. व्ही. रमणाCentral Governmentकेंद्र सरकारdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय