शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

CJI D. Y. Chandrachud: “आणीबाणीच्या काळात न्यायाधीशांनी हिंमत सोडली नाही”; CJI चंद्रचूड यांनी सांगितल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 14:43 IST

CJI D. Y. Chandrachud: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यामुळे नवी दिशा मिळाली. त्यावर आम्ही बरेच काम केले, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले.

CJI D. Y. Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अनेक विषयांवर स्पष्टपणे भाष्य करत असतात. यातच आता चंद्रचूड यांनी आणीबाणी काळातील आठवणी सांगताना त्या काळात न्यायाधीशांनी हिंमत सोडली नाही, असे प्रतिपादन केले. तसेच न्यायाधीशांनी सामाजिक असावे. त्यांचा समाजाशी संबंध असणे आवश्यक आहे. जेव्हा हे घडते, तेव्हा त्यांनी दिलेले निर्णय अधिक अर्थपूर्ण असतात, असेही चंद्रचूड यांनी नमूद केले. 

जेव्हा कायद्याच्या तत्त्वांचे पालन केले जात नाही. तेव्हा ते निर्णयांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. आपण सर्व न्यायाधीश आणि वकील या देशातील सामान्य नागरिकांसारखे आहोत. संविधान आपल्या सर्वांना योग्य मार्ग दाखवते, असेही चंद्रचूड यांनी सांगितले. स्वातंत्र्य, समानता यासारख्या मुद्द्यांवर संविधानात केलेल्या तरतुदी आपल्या देशाला एका धाग्यात बांधतात. आणीबाणीच्या काळात गुवाहाटी उच्च न्यायालयाने ज्या प्रकारचे काम केले ते कौतुकास्पद आहे. तो काळ इतका कठीण होता की, न्यायाधीशांनाही कठीण गोष्टींना सामोरे जावे लागले. पण कायदा जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही, असे कौतुकोद्गार सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काढले. 

या दिशेने बरेच काम केले गेले

समाजातील दुर्बल घटकाला न्याय मिळवून देणे हे आमचे प्राधान्य असायला हवे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले होते. यावर बोलताना, सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आम्हाला नवीन दिशा मिळाली आणि त्यादिशेने आम्ही बरेच काम केले. तसेच आसाम नेहमीच कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असतो. येथे दरवर्षी पुराचा प्रश्न येतो. लोकांची कागदपत्रेही गहाळ होतात. त्यांना मदतीची गरज आहे. गुवाहाटी उच्च न्यायालय दरवर्षी असे अनेक निर्णय देते जे आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी असतात. त्यांना मदत करणे हे सर्वात मोठे काम आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य असले पाहिजे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केले. 

दरम्यान, कायदेशीर आणि प्रशासकीय अडथळ्यांमध्ये अडकून लोकांना त्रास होणार नाही, हे न्यायव्यवस्थेने पाहावे, असा सल्ला देताना, कायद्याचा वापर अशा प्रकारे व्हायला हवा की, ज्यामुळे समस्या मुळापासून नष्ट होईल. पीडित पक्षाला त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी काम करा, अशी सूचनाही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचडू यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय