शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

CJI D. Y. Chandrachud: “आणीबाणीच्या काळात न्यायाधीशांनी हिंमत सोडली नाही”; CJI चंद्रचूड यांनी सांगितल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 14:43 IST

CJI D. Y. Chandrachud: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यामुळे नवी दिशा मिळाली. त्यावर आम्ही बरेच काम केले, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले.

CJI D. Y. Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अनेक विषयांवर स्पष्टपणे भाष्य करत असतात. यातच आता चंद्रचूड यांनी आणीबाणी काळातील आठवणी सांगताना त्या काळात न्यायाधीशांनी हिंमत सोडली नाही, असे प्रतिपादन केले. तसेच न्यायाधीशांनी सामाजिक असावे. त्यांचा समाजाशी संबंध असणे आवश्यक आहे. जेव्हा हे घडते, तेव्हा त्यांनी दिलेले निर्णय अधिक अर्थपूर्ण असतात, असेही चंद्रचूड यांनी नमूद केले. 

जेव्हा कायद्याच्या तत्त्वांचे पालन केले जात नाही. तेव्हा ते निर्णयांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. आपण सर्व न्यायाधीश आणि वकील या देशातील सामान्य नागरिकांसारखे आहोत. संविधान आपल्या सर्वांना योग्य मार्ग दाखवते, असेही चंद्रचूड यांनी सांगितले. स्वातंत्र्य, समानता यासारख्या मुद्द्यांवर संविधानात केलेल्या तरतुदी आपल्या देशाला एका धाग्यात बांधतात. आणीबाणीच्या काळात गुवाहाटी उच्च न्यायालयाने ज्या प्रकारचे काम केले ते कौतुकास्पद आहे. तो काळ इतका कठीण होता की, न्यायाधीशांनाही कठीण गोष्टींना सामोरे जावे लागले. पण कायदा जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही, असे कौतुकोद्गार सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काढले. 

या दिशेने बरेच काम केले गेले

समाजातील दुर्बल घटकाला न्याय मिळवून देणे हे आमचे प्राधान्य असायला हवे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले होते. यावर बोलताना, सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आम्हाला नवीन दिशा मिळाली आणि त्यादिशेने आम्ही बरेच काम केले. तसेच आसाम नेहमीच कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असतो. येथे दरवर्षी पुराचा प्रश्न येतो. लोकांची कागदपत्रेही गहाळ होतात. त्यांना मदतीची गरज आहे. गुवाहाटी उच्च न्यायालय दरवर्षी असे अनेक निर्णय देते जे आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी असतात. त्यांना मदत करणे हे सर्वात मोठे काम आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य असले पाहिजे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केले. 

दरम्यान, कायदेशीर आणि प्रशासकीय अडथळ्यांमध्ये अडकून लोकांना त्रास होणार नाही, हे न्यायव्यवस्थेने पाहावे, असा सल्ला देताना, कायद्याचा वापर अशा प्रकारे व्हायला हवा की, ज्यामुळे समस्या मुळापासून नष्ट होईल. पीडित पक्षाला त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी काम करा, अशी सूचनाही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचडू यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय