शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:46 IST

आम्हाला वाटते की सरन्यायाधीशांच्या मौखिक टिप्पणीमुळे हिंदू धर्माच्या आस्थांचा उपहास झाला आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या टाळल्या तर बरे होईल.'

खजुराहो येथील प्रसिद्ध जावरी मंदिरातील भगवान विष्णू यांच्या खंडित मूर्तीची दुरुस्ती करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी एक टिप्पणी केली होती. यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला. एवढेच नाही, तर विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनेनेही सरन्यायाधीशांना वाणीवर संयम ठेवण्याचा सल्ला दिला होता. आता यासंपूर्ण प्रकरणावर खुद्द सरन्यायाधीश बी.आर. गवई यां भाष्य केले आहे. “माझे वक्तव्य सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले. दुसऱ्या दिवशी कुणीतरी मला सांगितले की, माझे वक्तव्य सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो,” असे गवई म्हणाले.

सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी एका प्रकरणात सुनावणी वेळी केली. यासंदर्भात बोलताना कपिल सिब्बल म्हणाले, आम्हाला अशा गोष्टींचा सामना रोजच करावा लागतो. अशा प्रकारे कुणालाही बदनाम करणे योग्य नाही. सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले, ‘नेपाळमध्येही अशाच गोष्टी घडल्या होत्या.’ खरे तर, मूर्तीच्या दुरुस्तीच्या मागणीसंदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला फटकारत, ‘तुमची याचिका जनहित याचिका नाही, तर प्रचार याचिका आहे. जर तुम्ही भगवान विष्णूंचे एवढे कट्टर भक्त असाल तर मग त्यांच्याकडेच प्रार्थना करा,’ असे म्हटले होते. त्यांच्या टिप्पणीचा हा भाग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि लोक त्यांच्यावर टीकाही करत होते.

विश्वहिंदू परिषदेची प्रतिक्रिया -यासंदर्भात गुरुवारी विश्व हिंदू परिषदेचीही प्रतिक्रिया आली. संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी सरन्यायाधीशांच्या नावे एक पत्र लिहिले. या पत्रात म्हणण्यात आले आहे की, 'परवा सर्वोच्च न्यायालयात खजुराहो येथील प्रसिद्ध जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या खंडित मूर्तीच्या दुरुस्तीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी मौखिक टिप्पणी केली, मूर्तीच्या दुरुस्तीसाठी भगवंतांकडेच प्रार्थना करा. आपण म्हणता की, आपण भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात, तर आता त्यांच्याकडेच प्रार्थना करा. न्यायालय हे न्यायाचे मंदिर आहे. भारतीय समाजाची न्यायालयांवर श्रद्धा आणि विश्वास आहे. आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, हा विश्वास केवळ कायमच राहू नये, तर तो अधिक दृढ व्हावा.'

न्यायाधिशांनीही वाणीवर संयम ठेवायला हवा - विश्वहिंदू परिषदपुढे सल्ला देताना विश्व हिंदू परिषदेने म्हटले की, 'आपणा सर्वांचे कर्तव्य आहे की आपण आपल्या वाणीवर संयम ठेवायला हवा. विशेषत: न्यायालयात. ही जबाबदारी खटला लढवणाऱ्यांची आहे, वकिलांची आहे आणि तितकीच न्यायाधीशांचीही आहे. आम्हाला वाटते की सरन्यायाधीशांच्या मौखिक टिप्पणीमुळे हिंदू धर्माच्या आस्थांचा उपहास झाला आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या टाळल्या तर बरे होईल.'

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय