शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:46 IST

आम्हाला वाटते की सरन्यायाधीशांच्या मौखिक टिप्पणीमुळे हिंदू धर्माच्या आस्थांचा उपहास झाला आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या टाळल्या तर बरे होईल.'

खजुराहो येथील प्रसिद्ध जावरी मंदिरातील भगवान विष्णू यांच्या खंडित मूर्तीची दुरुस्ती करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी एक टिप्पणी केली होती. यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला. एवढेच नाही, तर विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनेनेही सरन्यायाधीशांना वाणीवर संयम ठेवण्याचा सल्ला दिला होता. आता यासंपूर्ण प्रकरणावर खुद्द सरन्यायाधीश बी.आर. गवई यां भाष्य केले आहे. “माझे वक्तव्य सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले. दुसऱ्या दिवशी कुणीतरी मला सांगितले की, माझे वक्तव्य सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो,” असे गवई म्हणाले.

सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी एका प्रकरणात सुनावणी वेळी केली. यासंदर्भात बोलताना कपिल सिब्बल म्हणाले, आम्हाला अशा गोष्टींचा सामना रोजच करावा लागतो. अशा प्रकारे कुणालाही बदनाम करणे योग्य नाही. सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले, ‘नेपाळमध्येही अशाच गोष्टी घडल्या होत्या.’ खरे तर, मूर्तीच्या दुरुस्तीच्या मागणीसंदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला फटकारत, ‘तुमची याचिका जनहित याचिका नाही, तर प्रचार याचिका आहे. जर तुम्ही भगवान विष्णूंचे एवढे कट्टर भक्त असाल तर मग त्यांच्याकडेच प्रार्थना करा,’ असे म्हटले होते. त्यांच्या टिप्पणीचा हा भाग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि लोक त्यांच्यावर टीकाही करत होते.

विश्वहिंदू परिषदेची प्रतिक्रिया -यासंदर्भात गुरुवारी विश्व हिंदू परिषदेचीही प्रतिक्रिया आली. संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी सरन्यायाधीशांच्या नावे एक पत्र लिहिले. या पत्रात म्हणण्यात आले आहे की, 'परवा सर्वोच्च न्यायालयात खजुराहो येथील प्रसिद्ध जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या खंडित मूर्तीच्या दुरुस्तीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी मौखिक टिप्पणी केली, मूर्तीच्या दुरुस्तीसाठी भगवंतांकडेच प्रार्थना करा. आपण म्हणता की, आपण भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात, तर आता त्यांच्याकडेच प्रार्थना करा. न्यायालय हे न्यायाचे मंदिर आहे. भारतीय समाजाची न्यायालयांवर श्रद्धा आणि विश्वास आहे. आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, हा विश्वास केवळ कायमच राहू नये, तर तो अधिक दृढ व्हावा.'

न्यायाधिशांनीही वाणीवर संयम ठेवायला हवा - विश्वहिंदू परिषदपुढे सल्ला देताना विश्व हिंदू परिषदेने म्हटले की, 'आपणा सर्वांचे कर्तव्य आहे की आपण आपल्या वाणीवर संयम ठेवायला हवा. विशेषत: न्यायालयात. ही जबाबदारी खटला लढवणाऱ्यांची आहे, वकिलांची आहे आणि तितकीच न्यायाधीशांचीही आहे. आम्हाला वाटते की सरन्यायाधीशांच्या मौखिक टिप्पणीमुळे हिंदू धर्माच्या आस्थांचा उपहास झाला आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या टाळल्या तर बरे होईल.'

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय