शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

भारतातील या शहरामध्ये 'देवा'साठी चक्क एअरपोर्ट करतात बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 19:52 IST

जगात असं कोणतं विमानतळ आहे जिथे धार्मिक यात्रेसाठी विमानाची धावपट्टी बंद केली जाते आणि विमानांच्या उड्डाणांची वेळ बदलली जाते?

तिरुअनंतपुरम - जगात असं कोणतं विमानतळ आहे जिथे धार्मिक यात्रेसाठी विमानाची धावपट्टी बंद केली जाते आणि विमानांच्या उड्डाणांची वेळ बदलली जाते? हे ऐकायला कदाचीत विचित्र वाटत असेल पण असं दक्षिण भारतातील केरळमध्ये होतं. येथे स्वामी पद्मनाभ स्वामी मंदिर यात्रेसाठी धावपट्टीला बंद केलं जातं. 

केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ कदाचीत अशाप्रकारचं जगातील एकमेव विमानतळ असण्याची शक्यता आहे. या विमानतळाची धावपट्टी सुप्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या सोहळ्यासाठी गेल्या काही दशकांपासून वर्षातून दोन वेळेस बंद केली जाते. याशिवाय विमानांच्या उड्डाणांची वेळही बदलली जाते. 

स्वामी पद्मनाभ मंदिराच्या 10 दिवसीय 'पैनकुनी' आणि 'अलपस्सी' उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंदिरातील मुर्त्यांची यात्रा काढण्याच्यावेळी विमानांच्या उड्डाणांना 5 तासांसाठी थांबवलं जातं. याबाबतची सुचना  विमानतळाकडून अधिका-यांना एक आठवडा आधीच दिली जाते. विमानतळ परिसराजवळील शनगुमुगम बीचजवळ सीआयएसएफचे शस्त्रधारी जवान संपूर्ण यात्रेदरम्यान धावपट्टीच्या दोन्ही बाजूला तैनात असतात, यात्रेनंतर मूर्त्यांना पुन्हा त्याच रस्त्याने आणलं जातं. उत्सवाच्या दिवशी संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत उड्डाणं थांबवली जातात. या पाच तासांमध्ये विमानतळ परिसरातून केवळ स्पेशल पास असलेल्या लोकांनाच जाण्याची परवानगी दिली जाते. कोणाला पास द्यायचा याची यादीही मंदिराकडूनच पाठवली जाते.  

वर्ष 1932 मध्ये या विमानतळाचं बांधकाम पूर्ण झालं होतं, पण या मंदिराची ही परंपरा याआधीपासून सुरू आहे.  

टॅग्स :KeralaकेरळAirportविमानतळ