शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

भारतातील या शहरामध्ये 'देवा'साठी चक्क एअरपोर्ट करतात बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 19:52 IST

जगात असं कोणतं विमानतळ आहे जिथे धार्मिक यात्रेसाठी विमानाची धावपट्टी बंद केली जाते आणि विमानांच्या उड्डाणांची वेळ बदलली जाते?

तिरुअनंतपुरम - जगात असं कोणतं विमानतळ आहे जिथे धार्मिक यात्रेसाठी विमानाची धावपट्टी बंद केली जाते आणि विमानांच्या उड्डाणांची वेळ बदलली जाते? हे ऐकायला कदाचीत विचित्र वाटत असेल पण असं दक्षिण भारतातील केरळमध्ये होतं. येथे स्वामी पद्मनाभ स्वामी मंदिर यात्रेसाठी धावपट्टीला बंद केलं जातं. 

केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ कदाचीत अशाप्रकारचं जगातील एकमेव विमानतळ असण्याची शक्यता आहे. या विमानतळाची धावपट्टी सुप्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या सोहळ्यासाठी गेल्या काही दशकांपासून वर्षातून दोन वेळेस बंद केली जाते. याशिवाय विमानांच्या उड्डाणांची वेळही बदलली जाते. 

स्वामी पद्मनाभ मंदिराच्या 10 दिवसीय 'पैनकुनी' आणि 'अलपस्सी' उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंदिरातील मुर्त्यांची यात्रा काढण्याच्यावेळी विमानांच्या उड्डाणांना 5 तासांसाठी थांबवलं जातं. याबाबतची सुचना  विमानतळाकडून अधिका-यांना एक आठवडा आधीच दिली जाते. विमानतळ परिसराजवळील शनगुमुगम बीचजवळ सीआयएसएफचे शस्त्रधारी जवान संपूर्ण यात्रेदरम्यान धावपट्टीच्या दोन्ही बाजूला तैनात असतात, यात्रेनंतर मूर्त्यांना पुन्हा त्याच रस्त्याने आणलं जातं. उत्सवाच्या दिवशी संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत उड्डाणं थांबवली जातात. या पाच तासांमध्ये विमानतळ परिसरातून केवळ स्पेशल पास असलेल्या लोकांनाच जाण्याची परवानगी दिली जाते. कोणाला पास द्यायचा याची यादीही मंदिराकडूनच पाठवली जाते.  

वर्ष 1932 मध्ये या विमानतळाचं बांधकाम पूर्ण झालं होतं, पण या मंदिराची ही परंपरा याआधीपासून सुरू आहे.  

टॅग्स :KeralaकेरळAirportविमानतळ