शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भारताच्या परवानगीनेच चोकसीला नागरिकत्व; अँटिग्वाचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 00:54 IST

मुंबई पोलीस आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतरच मेहुल चोकसी याला आपण नागरिकत्व दिले, असा गौप्यस्फोट अँटिग्वा सरकारने केला आहे.

नवी दिल्ली : मुंबई पोलीस आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतरच मेहुल चोकसी याला आपण नागरिकत्व दिले, असा गौप्यस्फोट अँटिग्वा सरकारने केला आहे.पंजाब नॅशलन बँकेतील १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील एक आरोपी असलेला मेहुल चोकसी देशाबाहेर पळून गेल्यानंतर त्याला कॅरेबियन देश अँटिग्वाने नागरिकत्व दिले आहे. त्यावरून वाद सुरू आहे. याप्रकरणी अँटिग्वाने एक निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली. अँटिग्वाने म्हटले की, नागरिकत्व देण्यापूर्वी चोकसीची आवश्यक ती सर्व पार्श्वभूमी तपासण्यात आली. त्याच्याविरुद्ध सेबीने दोन वेळा चौकशी केल्याचे आढळून आले. तथापि, ही प्रकरणे आता बंद करण्यात आल्याचे सेबीने आम्हाला कळविले.अँटिग्वाच्या सिटिझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट युनिटने (सीआययू) म्हटले की, चोकसीच्या नागरिकत्वासाठी भारत सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, मुंबईत विभागीय पासपोर्ट कार्यालय व मुंबई पोलीस यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले. या सर्व संस्थांनी चोकसीविरुद्ध कोणताही प्रतिकूल शेरा दिला नाही. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच त्याला अँटिग्वा आणि बरबुडाचे नागरिकत्व देण्यात आले.सीआययूचे निवदेन ‘अँटिग्वा आॅब्झरवर’ या दैनिकाने आपल्या वेबसाईटवर पोस्ट केले आहे. त्यात म्हटले आहे की, भारत सरकार आणि भारतातील सर्व आवश्यक तपास संस्थांकडून तर चोकसीची माहिती घेण्यात आलीच; पण इंटरपोल व थॉम्पसन रॉयटर्स वर्ल्ड-चेकसारख्या तिसऱ्या पक्षाकडूनही चौकशी करण्यात आली. सर्वांनी अनुकूल अहवाल दिल्यानंतरच चोकसीला नागरिकत्व देण्यात आले.कोणतीही माहिती दिली नाही - सेबीचोकसीबाबत अ‍ॅन्टीग्वा सरकारला कुठलाही सकारात्मक अहवाल किंवा त्याच्याविरोधातील चौकशीसंबंधी कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही, असा खुलासा ‘सेबी’ने केला आहे. अ‍ॅन्टीग्वाच्या सीआययू विभागाने नागरिकत्व देण्याआधी ‘सेबी’कडे विचारणा केली होती. त्यावर चोकसीसंबंधी दोन प्रकरणांची चौकशी करुन ती प्रकरणे समाधानकारकरित्या बंद करण्यात आल्याचे ‘सेबी’ने कळविल्याचे अ‍ॅन्टीग्वा सरकारचे म्हणणे आहे.प्रमाणपत्र नेमके दिले कोणी?मुंबई : चोक्सीबाबत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने दिलेल्या चारित्र्य प्रमाणपत्रानुसार आम्ही कार्यवाही केली. त्यामुळे यात पासपोर्ट कार्यालयाचा काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण पासपोर्ट कार्यालयाने दिले आहे. मात्र विशेष शाखेने आपल्याकडून असे कुठल्याच स्वरूपाचे प्रमाणपत्र दिले नसल्याचा दावा केला आहे. २०१६ पासून आतापर्यंतचा तपशील तपासण्यात आला आहे. त्यात या व्यक्तीच्या नावाने कुठलेच प्रमाणपत्र दिल्याचे दिसून आले नसल्याचे विशेष शाखा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा