शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Citizenship Amendment Bill: लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 21:19 IST

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे.

नवी दिल्लीः लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे. विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधात 80 सदस्यांनी मतदान केले. या विधेयकाला काँग्रेसने कडाडून विरोध केला. आता त्या विधेयकाला राज्यसभेनंही मंजुरी दिली आहे. राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं, तेव्हा विरोधकांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसुद्धा विरोधकांच्या प्रश्नांचं निरसन केलं.भारतातील मुस्लिमांच्या नागरिकत्वावर कुठलाही परिणाम होणार नाही, असंही अमित शाहांनी स्पष्ट केलेलं आहे.  काही सदस्यांनी हे विधेयक संविधानाला धरून नसल्याचं सांगितलं आहे. मी सर्वांनाच उत्तर देऊ इच्छितो की, जर या देशाचं विभाजन झालं नसतं तर हे विधेयक आणायची गरजच पडली नसती. विभाजनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे विधेयक आणावं लागलं आहे. देशाच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मोदी सरकार आलं आहे. आम्ही या विधेयकात सहा धर्माच्या लोकांचा समावेश केलेला आहे, पण त्याचं काँग्रेसला काहीही कौतुक नाही. काँग्रेस फक्त मुस्लीम धर्मीयांचं का नाव नाही, असा प्रश्न विचारत आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक आहेत का?; असा प्रतिप्रश्नही अमित शाहांनी उपस्थित केला आहे.

राज्यसभेतील महत्त्वाच्या घडामोडी>> राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी, विधेयकाच्या बाजूनं ११७ सदस्यांनी तर विरोधात ९२ खासदारांनी केलं मतदान. >> नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या 14 सूचनांवर राज्यसभेत मतदान सुरू

>>नागरिकत्व सुधारणा विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवावं की नाही, यावर राज्यसभेत मतदानाला सुरुवात

>>पाकिस्तानात हिंदू आणि शीख मुलींचं जोरजबरदस्तीनं धर्मपरिवर्तन केलं जातं. अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय केले गेलेत - अमित शाह

>>पाकिस्तानात हिंदू आणि शीख मुलींचं बळजबरीने धर्मपरिवर्तन केलं जातं. अफगाणिस्तानातही अल्पसंख्याकांवर जुलूम केले गेले: 

>>पाकच्या पंतप्रधानांनी जे विधान केलं, तेच आज काँग्रेसनं राज्यसभेत केलं, काँग्रेस-पाकिस्तानी नेत्यांची विधान एकसारखीच, पाकिस्तानचं नाव घेतल्यावर काँग्रेसला राग का येतो?

>>आसाम कराराचं आम्ही पूर्णतः पालन केलं आहे. आसामच्या संस्कृतीचं संरक्षण करणं आमचं कर्तव्य, आम्ही ते पार पाडू

>> आयडिया ऑफ इंडियाबद्दल मला सांगू नका. माझा जन्म इथेच झालाय, मला आयडिया ऑफ इंडियाची कल्पना आहे

>>काही जण सत्तेसाठी कसे कसे रंग बदलतात, शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाचं समर्थन केलं आणि एका रात्रीत असं काय झालं की ते विधेयकाच्या विरोधात उभे राहिले. 

>>काँग्रेसनं जिन्ना यांची मागणी का स्वीकारली?, काँग्रेसनं धर्माच्या आधारे देशाचं विभाजन का केलं?

>> नेहरू- लिकायत यांच्या करारात अल्पसंख्याक समाजाला बहुसंख्य समाजासारखी समानता देण्याचा उल्लेख आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि सरन्यायाधीश अशी अनेक सर्वोच्च पदं अल्पसंख्याकांनी भूषवलेली आहेत. 

>>बांगलादेशी घुसखोरांचा उल्लेख ममता बॅनर्जी यांनी 2005मध्ये केला होता. ममता बॅनर्जींनी जे सांगितलं त्याचाच मी उल्लेख केला आहे. 

>> हे विधेयक ५० वर्षांपूर्वी आणलं असतं तर आज इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली नसती.

>> राजकारण करा, पण भेदभाव निर्माण करू नका. 

>> हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे लागलेली आग आपलंच घर जाळू शकते.

>> या विधेयकामुळे भारतातील मुस्लिमांच्या नागरिकत्वावर कुठलाही परिणाम होणार नाही. त्यांनी निश्चिंत राहावं. 

>> पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू आणि शिखांना भारतात यायचं असेल, तर तुमचं पुनर्वसन आम्ही करू, असं महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं. 

>> पाकिस्तानातील सर्व मुस्लिमेतर जनांना सुरक्षा देण्यास बांधील असल्याचं काँग्रेसच्या घटनेत नमूद आहे. आम्ही त्यांचं तेच ध्येय पूर्ण करतोय- अमित शाह

टॅग्स :Amit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक