शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

Citizenship Amendment Bill: ईशान्य भारत पेटला! आसाममध्ये २ आंदोलकांचा मृत्यू; मेघालयात इंटरनेट ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 20:58 IST

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला वाढता विरोध; ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये आंदोलनं

गुवाहाटी/शिलाँग: लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होताच ईशान्य भारताच्या बहुतांश भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आसामची राजधानी गुवाहाटीत विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यात जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. स्थानिकांच्या अधिकारांना कोणताही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत राज्यातील जनतेला संबोधित केलं. नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे स्थानिकांच्या परंपरा, संस्कृती, भाषा आणि जमिनीच्या अधिकारांना धक्का लागणार नाही. त्यामुळे स्थानिकांनी चिंता करू नये. आसाम कराराच्या ६ व्या कलमांतर्गत स्थानिकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यात येईल, असा विश्वास सोनोवाल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला दिला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होताच ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये आंदोलनं सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर मेघालयातील इंटरनेट आणि मेसेजिंग सेवा खंडित करण्यात आल्या आहेत. पुढील ४८ तासांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. पीटीआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ईशान्य भारताच्या अनेक भागांमधील इंटरनेट आणि मेसेजिंग सेवा बंद करण्यात आल्या आहेत. गुवाहाटी पाठोपाठ मेघालयाची राजधानी शिलाँगमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मेघालयातील परिस्थिती अतिशय गंभीर स्वरुप धारण करत असल्यानं मुख्यमंत्री कोनराड संगमा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. संगमा यांनी आधीपासूनच नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssamआसाम