शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
5
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
6
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
7
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
8
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
9
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
10
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
11
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
12
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
13
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
14
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
15
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
16
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
18
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
19
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
20
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक

नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनाबाह्य- अमर्त्य सेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 06:16 IST

नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यघटनेतील तरतुदींचा भंग करणारा आहे, असे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी बुधवारी येथे सांगितले.

बंगळुरू : नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यघटनेतील तरतुदींचा भंग करणारा आहे, असे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी बुधवारी येथे सांगितले. हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल करायला हवा, असेही ते म्हणाले. इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा धार्मिक भेदभावाच्या आधारे नागरिकत्वाशी संबंध जोडणे ही घटनाबाह्य कृती आहे. एखादा माणूस कुठे जन्माला आला त्यावरून त्याचे नागरिकत्व ठरविले जाते.धर्माच्या आधारे नागरिकत्व देण्याच्या मुद्यावर घटना समितीतही चर्चा झाली होती. त्यावेळीही अशा तरतुदीला तीव्र विरोध करण्यात आला होता. धर्माच्या आधारे होणारा भेदभाव कोणीही मान्य करता कामा नये. हिंसाचार माजविणाऱ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या संकुलात येण्यापासून रोखण्यास तेथील प्रशासन अयशस्वी ठरले. प्रशासनाने नीट समन्वय न साधल्याने विद्यापीठात पोलिसांनी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासही उशीर झाला, असेही अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे दुही माजविण्याचे सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न आसामच्या जनतेने हाणून पाडावेत, असे आवाहन नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी समन्वय समितीचे अध्यक्ष व प्रख्यात साहित्यिक डॉ. हिरेन गोहेन यांनी केले आहे. हे विधेयक आणण्यामागे देश व विदेशातील उद्योगपतींचे हित जपण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. बांगलादेशी हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळून त्यांना आसाममध्ये राहता यावे म्हणून हा कायदा केला आहे. त्याच्याविरोधातील आंदोलन यापुढेही सुरू राहिले पाहिजे, तरच हा कायदा रद्दबातल होईल, असेही हिरेन गोहेन यांनी सांगितले.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात त्रिपुरातील आगरतळा येथे शेकडो आदिवासी नागरिकांनी जेएमएसीएए या संयुक्त समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी जोरदार निदर्शने केली. याआधी या संघटनेच्या वतीने ९ डिसेंबर रोजी बंदही पुकारण्यात आला होता. (वृत्तसंस्था)>आव्हान याचिका वर्ग करा : केंद्र सरकारविविध उच्च न्यायालयांत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाºया याचिका दाखल झाल्या असून, त्या सर्वोच्च न्यायालयात वर्ग कराव्यात, अशी विनंती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला केली. या आव्हान याचिकांवर विविध उच्च न्यायालयांनी निरनिराळे निकाल दिले, तर गोंधळ होऊ शकतो, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाला सांगितले.