शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कडक सॅल्यूट! आई-वडील अशिक्षित पण मुलांना शिकवलं, सक्षम केलं; 4 पैकी एक IAS, 3 अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 12:23 IST

आई-वडिलांची धडपड पाहून मुलांनी मेहनत घेतली आणि अखेर पालकांच्या कष्टाचं सोनं केलं, आज त्यांच्या यशाची चर्चा सर्वत्र होत आहे.

जीवनात कठोर संघर्ष करूनच यश मिळवता येते. कठीण परिस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेऊनच यश मिळू शकते. संघर्षाचे युग संपले की यशाचे पर्व सुरू होते. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. जी समजल्यावर फिल्मी वाटेल पण ती खरी आहे. खरं तर आई-वडिलांची धडपड पाहून मुलांनी मेहनत घेतली आणि अखेर पालकांच्या कष्टाचं सोनं केलं, आज त्यांच्या यशाची चर्चा सर्वत्र होत आहे.

प्राचार्य श्रवण कुमार सैनी, ज्यांच्या पालकांनी शाळा कधीच पाहिली नसेल, पण आपल्या चार मुलांना इतकं शिकवलं की एक मुलगा आयएएस आहे आणि तीन मुलं मोठ्या पदांवर आहेत. श्रवण कुमार सैनी सांगतात की, त्यांचे वडील छोटे शेतकरी होते आणि आई-वडील दोघेही कधीच शाळेत गेले नाहीत, पण त्यांनी आम्हा सर्व भावांना अभ्यासाची इतकी प्रेरणा दिली की आज सर्वजण यशस्वी टप्प्यावर आहेत.

श्रवण कुमार सैनी यांनी सांगितले की 7 भाऊ आणि बहिणी होत्या. वडील करत असलेल्या शेतीवर संपूर्ण कुटुंब अवलंबून होतं. अशा परिस्थितीत चारही भाऊ वडिलांना मदत करण्यासाठी शेतात जायचे आणि शेतात गाई-म्हशी चरून घरी परतायचे आणि शाळेत जायचे. त्यांनी सांगितले की, वडिलांचा संघर्ष आणि आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना वेदना होत होत्या आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली, आज हे चारही भाऊ आपल्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत.

चार भावांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक सरकारी शाळेत घेतले आणि चुरू येथील लोहिया कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षणही घेतले. याचा परिणाम असा झाला की थोरला भाऊ डॉ. नवरंग लाल सैनी IAS आणि धाकटा छगनलाल सैनी RTDC मध्‍ये मॅनेजर आणि तिसरा भाऊ जो या जगात नाही पण तो गोविंद सैनी देखील RTDC चे चेअरमन राहिले आणि लहाण असलेले श्रावण कुमार सैनी प्राचार्य आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी