शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 15:18 IST

चिराग पासवान यांच्या पक्षाचा केंद्रात NDA सरकारला आणि बिहारमध्ये नितीश कुमारांच्या सरकारला पाठिंबा

बिहारमध्ये साऱ्यांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्याचअनुषंगाने बिहारच्या राजकारणात खूप गोंधळ उडाला आहे. विरोधी पक्ष आणि सरकार एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सततच्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, गुन्हेगारी नियंत्रणाबाहेर गेलेल्या सरकारला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी दुःख  व्यक्त केले आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खुनाच्या बातम्या येत आहेत. गेल्या एका महिन्यात ५० हून अधिक हत्येची प्रकरणे नोंदवली गेली. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारामुळे आणि रुग्णालयात झालेल्या हत्येमुळे लोक घाबरले आहेत. यामुळेच आता सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. याचदरम्यान, सरकारला पाठिंबा देणारे राजकीय पक्षही आता संतप्त झाल्याचे दिसत आहे.

प्रशासन गुन्हेगारांपुढे हतबल

बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले, "ज्या पद्धतीने गुन्हे घडत आहेत, त्यामुळे प्रशासन पूर्णपणे गुन्हेगारांपुढे नतमस्कत झाल्याचे दिसत आहे. या घटनेचा निषेध करणे आवश्यक आहे. पण त्याआधी असा प्रश्न आहे की, अशा घटना का घडत आहेत? यावर बोलणे महत्त्वाचे आहे. गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. जर ती अशीच सुरू राहिली, तर परिस्थिती आणखी भयानक होईल. बिहार आता सरकारच्या नियंत्रणात राहिलेले नाही. लोक भयंकर कंटाळले आहेत. मला दुःख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय, जिथे गुन्हेगारी नियंत्रणाबाहेर गेली आहे."

"बिहारमधील गुन्हेगारी घटनांमागे निवडणुकांचे समीकरण असल्याचे नाकारता येणार नाही. हे सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र असू शकते, परंतु काहीही झाले, तरीही त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. या सगळ्यामध्ये मी सरकारला वेळेवर कारवाई करण्याची विनंती करतो," असेही चिराग पासवान म्हणाले.

चिराग पासवान गेल्या काही दिवसांपासून सरकारवर सतत प्रश्न उपस्थित करत आहेत. यापूर्वी चिराग यांच्या पक्षाच्या इतर खासदारांनीही कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले होते आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडून धडा घेण्याचा सल्ला दिला होता.

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानNitish Kumarनितीश कुमारBiharबिहारGovernmentसरकार