शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

लडाखमध्ये चिनी सैन्याने उभारले होते तंबू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 04:39 IST

मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात चिनी सैैनिक लडाखच्या दमचोक भागात घुसले होते आणि तंबूही उभारले होते. त्यानंतर ब्रिगेडस्तरीय चर्चेनंतर ते परत तर गेले मात्र, त्यांना हे आश्वासन द्यावे लागले होते की, राज्य सरकार दमचोक भागातील रस्ते निर्मितीचे काम थांबवेल. सध्या या भागात अद्यापही दोन तंबू उभारलेले आहेत.

- सुरेश डुग्गर नवी दिल्ली : मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात चिनी सैैनिक लडाखच्या दमचोक भागात घुसले होते आणि तंबूही उभारले होते. त्यानंतर ब्रिगेडस्तरीय चर्चेनंतर ते परत तर गेले मात्र, त्यांना हे आश्वासन द्यावे लागले होते की, राज्य सरकार दमचोक भागातील रस्ते निर्मितीचे काम थांबवेल. सध्या या भागात अद्यापही दोन तंबू उभारलेले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये चीनचे सैन्य पूर्व लडाखस्थित दमचोक सेक्टरमध्ये जवळपास ४०० मीटर आत घुसले होते. त्यांनी येथे पाच तंबू उभारले होते. असेही सांगितले जात आहे की, दोन्ही देशांत ब्रिगेडियर स्तराची चर्चा झाल्यानंतर चेरदांग- नेरलांग - नल्लान भागातील तीन तंंबू हटविण्यात आले. पण, दोन तंबू अद्यापही उभे आहेत. यात चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) सैनिक राहत आहेत. भारत आणि चीनदरम्यान ४ हजार किमी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) जवळपास २३ वादग्रस्त आणि संवेदनशील भागापैकी दमचोक एक आहे. येथे सीमेची स्थिती स्पष्ट नसल्याने चीनने अनेकदा घुसखोरी केली आहे. भारतीय सैनिक येथे सदैव तत्पर असतात.लडाखमध्ये त्रिग हाइटस, दुमशेले, चुमार, स्पांगुर दर्रा आणि पांगोंग सो यांसारखे अनेक वादग्रस्त भाग आहेत. लडाखमध्ये १९९३ मध्ये फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते आणि लोकांना चीन सीमेच्या नजीकच्या भागात जाण्यास परवानगी देण्यात आली होती त्या वेळी चिनी सैन्याची घुसखोरी आणि भारतीय शेतकऱ्यांना धमकविण्याची बाब प्रथम समोर आली होती.घुसखोरी आणि अत्याचारांच्या घटना त्यापूर्वी फक्त सरकारी रेकॉर्डवरच नोंद करण्यात येत होत्या. घुसखोरीचे वृत्त अनेक महिन्यांनंतर लेह मुख्यालयात येत होते. हेही खरे आहे की, लेह फेस्टिव्हलमध्ये सहभागी पत्रकारांना पैगांग झीलसह चीन सीमेजवळच्या भागात दौरा करण्याची परवानगी प्रथमच देण्यात आली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने चीनच्या सीमेवर गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला होता. अन्यथा या भागात भारतीय सैनिक कधीतरीच दिसून येत होते. पण, चिनी सैनिक नियमित गस्त घालत होते आणि भारतीय हद्दीत आपला ताबा दाखविण्याचा प्रयत्न करत होते. लेहस्थित प्रशासकीय अधिकारी म्हणतात की, अक्साई चीनला लागून असलेल्या भागावर चीन आपला ताबा दाखवत तेथे पाय रोवू पाहत आहे.‘राजनैतिक स्तरावरच चर्चेने प्रश्न सोडवावा’डोकलाममध्ये जून २०१६ मध्ये भारत आणि चीनच्या सैैन्यात तणाव वाढला होता. त्या वेळी चीनचे सैनिक रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करत होते. लडाख सेक्टरमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी कधी थांबली नाही ही वस्तुस्थिती आहे.१९६२ च्या चिनी हल्ल्यानंतर आजही घुसखोरी सुरू आहे. लडाखच्या दिशेने सैन्य आणि तोफखान्यांत भर पडत असली तरी हा प्रश्न राजनैतिक स्तरावरच चर्चेने सोडविण्याचा प्रयत्न आहे, असे येथील प्रशासकीय अधिकारी सांगतात.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन