शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! भारतासाठी किती धोकादायक आहे चीनमध्ये पसरलेला रहस्यमयी आजार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 17:29 IST

भारत सरकारही या आजाराबाबत सतर्क झाले आहे. या आजारावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

चीनमध्ये सध्या लहान मुलं आजारी पडत आहेत. रुग्णालयात उपचारासाठी मुलांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याचं कारण म्हणजे तिथे एका नव्या आजाराची एन्ट्री झाली आहे. न्यूमोनिया या आजाराने मोठ्या संख्येने मुलं बाधित होत असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याप्रकरणी चीनची चौकशी केली. याच दरम्यान, भारत सरकारही या आजाराबाबत सतर्क झाले आहे. या आजारावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. हा आजार भारतासाठीही धोकादायक ठरू शकतो का? त्याचा इथे परिणाम होईल का आणि झालाच तर सरकार किती तयार आहे? हे जाणून घेऊया...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटलं आहे की भारत चीनमधील मुलांमध्ये निमोनियाच्या नोंदलेल्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. भारताला धोका कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. पण चीनमध्ये ज्या वेगाने हा आजार मुलांमध्ये पसरत आहे त्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. 

जगालाही याची चिंता आहे. कारण लहान मुलांचा हा आजार जर कोरोनासारखा जगात पसरला तर परिस्थिती किती धोकादायक असेल याची कल्पनाही करणे कठीण आहे. जगातील अनेक देश यासाठी अलर्ट झाले आहेत. लहान मुलांमधील रहस्यमयी न्यूमोनियामुळे भारत सतर्क आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात तापाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. 

DGHS च्या देखरेखीखाली आरोग्य मंत्रालयात बैठक झाली आहे. सरकारने सध्या कोणत्याही प्रकारची चिंता नाकारली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये एवियन इन्फ्लूएंझाची प्रकरणे आढळल्यानंतर भारतातील सिस्टमची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे. हा आजार भारतात येण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे, WHO ने चीनमधील वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. 

चीनकडे तपशीलवार माहितीसाठी अधिकृत विनंती केली आहे. मात्र, या प्रकरणी चीनने अद्याप कोणतंही उत्तर दिलेले नाही. इंटरनॅशनल मीडिया रिपोर्ट्स नमूद केलं आहे की, चिनी अधिकार्‍यांनी कोरोना निर्बंध हटवल्यामुळे आणि इन्फ्लूएन्झा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया यांसारख्या रोगाच्या प्रसारामुळे या आजारात वाढ झाल्याचं कारण दिले आहे. ProMED नुसार, चीनमध्ये केवळ विद्यार्थीच आजारी नाहीत, तर अनेक शिक्षकांनाही न्यूमोनियाची लागण झाली आहे.  

टॅग्स :Indiaभारतchinaचीन