शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Narendra Modi: चीनचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानातून थेट भारतात येणार? नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 10:15 IST

वांग यी अशा वेळी भारत दौऱ्यावर येत आहेत, जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. दुसरीकडे गलवान घाटीमध्ये युद्धसदृष्य परिस्थिती बनल्यानंतर चीनचा बडा नेता भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे उद्यापासून भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.  ते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल यांना भेटणार असल्याचे समजते आहे. वांग यी अशा वेळी भारत दौऱ्यावर येत आहेत, जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. दुसरीकडे गलवान घाटीमध्ये युद्धसदृष्य परिस्थिती बनल्यानंतर चीनचा बडा नेता भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. जर सारे ठीक राहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. 

चीनमध्ये यंदाा ब्रिक्स संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला मोदी उपस्थित राहू शकतात. गेल्या दोन वर्षांपासून संबंध ताणलेले असल्याने दोन्ही देशांचे नेते एकमेकांकडे गेले नव्हते. आता वांग यी भारतात येत असल्याने चीनने जयशंकर यांच्या दौऱ्याचे मार्ग मोकळे केले आहेत. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास उद्याच्या भेटीने मदत मिळणार आहे. 

वांग यांच्या दौऱ्यानंतर सारे काही ठीक झाले तर मोदी देखील ब्रिक्स शिखर परिषदेला जातील. याचबरोबर तिथे रशिया-चीन आणि भारत यांच्यादरम्यान मोठी बैठक आयोजित होण्याची शक्यता आहे. वांग यी हे सध्या पाकिस्तानात आहेत. तिथे इस्लामिक देशांच्या संघटनेची इस्लामिक सहयोग संघटना ओआयसीची बैठक सुरु आहे. चीन जरी सदस्य नसला तरी पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. वांग यी भारतात येणार का याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतू जर ते आले तर २०१९ नंतर पहिलीच भेट असणार आहे. 

पाश्चात्य देश अनेक प्रकारे भारताचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जपानच्या पंतप्रधानांशी झालेली भेट आणि ब्रिटीश आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांशी फोनवरील संवाद हा याच भागाचा भाग आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटले आहे की, भारताचे शस्त्रास्त्रांसाठी रशियावर अवलंबित्व अशा वेळी होते जेव्हा अमेरिका या बाजारात उतरली नव्हती. पण आता त्याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. ही खूप वेगळी वेळ आहे. तो काळ आता बदलला आहे. गेल्या 25 वर्षांत भारतासोबतचे आमचे संरक्षण संबंध दृढ झाले आहेत.

टॅग्स :chinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Dovalअजित डोवाल