शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशातील दहा हजार व्यक्तींवर चिनी कंपनीची पाळत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 1:13 AM

भारतातर्फे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र, सरकार या प्रकारची शहानिशा व चौकशी करीत आहे, असे समजते.

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, त्यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील सुमारे दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचालींवर चीनमधील झेनुआ ही कंपनी पाळत ठेवून असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.भारतातर्फे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र, सरकार या प्रकारची शहानिशा व चौकशी करीत आहे, असे समजते. चीनच्या एप्समार्फतही असे प्रकार होत असल्याचे आढळून आल्याने त्यावर भारताने बंदी घातली आहे. पार्श्वभूमीवर देशाची सायबर सुरक्षा अधिक मजबूत करावी, अशी मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली. या कंपनीने ब्रिटन, आॅस्ट्रेलियातील महत्त्वाच्या व्यक्तींवरही पाळत ठेवली असल्याचे वृत्त इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केले आहे. चीनच्या भारतातील राजदूताने मात्र याचा इन्कार केला आहे.पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांत तणाव वाढला असून झेनुआच्या हेरगिरीच्या घटनेने भारतात खळबळ माजली आहे. पाच पंतप्रधान, २४ मुख्यमंत्री, सरन्यायाधीश, सर्व पक्षांचे ३५० खासदार, महापौर, राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार यांच्यासह दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नातेवाईकांवर तर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, एच. डी. देवेगौडा यांच्यावर व त्यांच्या नातेवाईकांवर झेनुआने पाळत ठेवली होती वा आहे.यांच्यावरही ठेवले लक्षराष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगपती रतन टाटा, अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, रविशंकर प्रसाद, निर्मली सीतारामन, स्मृती इराणी, पीयूष गोयल, चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हालचालींवरही या कंपनीचे लक्ष होते.याशिवाय द हिंदू समूहाचे अध्यक्ष एन. रवी, इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई, झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी, पंतप्रधान कार्यालयातील माजी माध्यम सल्लागार संजय बारू, इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य संपादक राजकमल झा यांच्यावरही चिनी कंपनीने पाळत ठेवली, असे वृत्तात म्हटले आहे.अशी ठेवण्यात येते पाळतचीनचे सरकार व कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी झेनुआ कंपनी संबंधित असून तिचे प्रमुख कार्यालय शेन्झेन शहरामध्ये आहे. भारतातील राजकीय नेत्यांवरच नाही तर उद्योगक्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती, न्याययंत्रणा, माध्यमे आदी क्षेत्रांतील व्यक्तींच्या हालचालींवर झेनुआ कंपनी पाळत ठेवण्याचे काम करते.या व्यक्तींच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून त्यांची सर्व वैयक्तिक माहिती जमा करण्यात येते. इतकेच नव्हे तर त्या व्यक्तींचे मित्र, अनुयायी कोण आहेत, याचाही तपशील ही कंपनी गोळा करते. ही व्यक्ती कुठे कुठे जाते, त्याचा मागोवाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतला जातो.या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सर्व खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील माहिती गोळा करून तिचे विश्लेषण केले जाते. त्यातून त्या व्यक्तींविषयी चीन सरकार आडाखे बांधून भूमिका घेते, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदNarendra Modiनरेंद्र मोदी