शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

डोंगलांगमधून लष्कर न हटवल्यास हुसकावून लावू, चीनची भारताला धमकी

By admin | Updated: July 5, 2017 16:05 IST

सिक्कीम सीमेसंदर्भात भारतानं कडक भूमिका घेतल्यानं चीनचा तीळपापड झाला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - सिक्कीम सीमेसंदर्भात भारतानं कडक भूमिका घेतल्यानं चीनचा तीळपापड झाला आहे. चिडलेल्या चीननं भारताला धमकावण्यास सुरुवात केली आहे. भारतीय लष्करानं सिक्कीम सीमेवरून लष्कर न हटवल्यास त्यांना आम्ही हुसकावून लावू, असा धमकीवजा इशाराच चीननं भारताला दिला आहे. चीनचं सरकारी वृत्त ग्लोबल टाइम्समधून छापून आलेल्या लेखातून अशी धमकी देण्यात आली आहे. युद्ध झाल्यास भारताला 1962पेक्षा अधिक गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही चीननं म्हटलं आहे. जर भारतानं सिक्कीम सीमेवर त्यांच्या भागातून लष्कर हटवलं नाही, तर आम्ही त्यांना हुसकावून लावू, असंही चीन म्हणाला आहे. ग्लोबल टाइम्सच्या लेखातून ही टिपण्णी करण्यात आली आहे. भारतीय लष्कर सन्मानासहीत सिक्कीम सीमेवरून मागे हटू शकते, अन्यथा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक त्यांनी हुसकावून लावतील, असंही लेखात म्हटलं आहे. सिक्कीममधल्या डोंगलांग भागातून भारतीय लष्कर मागे हटल्यास दोन्ही देशांतील तणाव निवळेल, लेखात भारताविरोधात वादग्रस्त भाषेचा वापर करण्यात आला आहे. भारतानं 21व्या शतकातल्या सभ्यतेचा अपमान केल्याचाही आरोप केला आहे. दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं सीमेवर आगळिकीवरून विधान जारी केलं आहे. त्यातही भारताला सिक्कीम भागातून मागे हटण्याची सूचना करण्यात आली आहे.

(सिक्कीम सीमेवर भारतीय लष्करानं वाढवली कुमक)(सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द)

सिक्कीममधल्या डोंगलांग भागातील सीमावादावरचं भारत आणि चीनमधलं वाकयुद्ध अद्यापही सुरूच आहे. भारतानं जर चीनचं ऐकलं नाही, तर चीन स्वतःच्या सैन्याच्या ताकदीचा वापर करेल, असं एका चिनी तज्ज्ञानं यापूर्वीच सांगितलं होतं. डोंगलांगमध्ये दोन्ही देशांमधील वादाचा हा तिसरा आठवडा आहे. दोन्ही देशांमधील हा वाद योग्यरीत्या हाताळला न गेल्यास युद्धाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते, अशा इशारा चीनच्या थिंक टँकनं आधीच दिला होता.
 
भारताला समजावण्याचा चीन कसोशीनं प्रयत्न करत असून, सीमेवर शांती नांदावी यासाठी चीन कटिबद्ध आहे, असंही शांघाई अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेजचे रिसर्चर फेलो हू झियोंग म्हणाले होते. मात्र तरीही भारतानं चीनचं न ऐकल्यास चीनकडे सैन्य शक्तीचा वापर करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीमुळेच भारत चीनला युद्धासाठी भडकावतो आहे. ट्रम्प यांच्या नजरेत भारत चीनशी मुकाबला करण्यासाठी कमकुवत आहे, असंही हू म्हणाले आहेत.