शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डोंगलांगमधून लष्कर न हटवल्यास हुसकावून लावू, चीनची भारताला धमकी

By admin | Updated: July 5, 2017 16:05 IST

सिक्कीम सीमेसंदर्भात भारतानं कडक भूमिका घेतल्यानं चीनचा तीळपापड झाला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - सिक्कीम सीमेसंदर्भात भारतानं कडक भूमिका घेतल्यानं चीनचा तीळपापड झाला आहे. चिडलेल्या चीननं भारताला धमकावण्यास सुरुवात केली आहे. भारतीय लष्करानं सिक्कीम सीमेवरून लष्कर न हटवल्यास त्यांना आम्ही हुसकावून लावू, असा धमकीवजा इशाराच चीननं भारताला दिला आहे. चीनचं सरकारी वृत्त ग्लोबल टाइम्समधून छापून आलेल्या लेखातून अशी धमकी देण्यात आली आहे. युद्ध झाल्यास भारताला 1962पेक्षा अधिक गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही चीननं म्हटलं आहे. जर भारतानं सिक्कीम सीमेवर त्यांच्या भागातून लष्कर हटवलं नाही, तर आम्ही त्यांना हुसकावून लावू, असंही चीन म्हणाला आहे. ग्लोबल टाइम्सच्या लेखातून ही टिपण्णी करण्यात आली आहे. भारतीय लष्कर सन्मानासहीत सिक्कीम सीमेवरून मागे हटू शकते, अन्यथा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक त्यांनी हुसकावून लावतील, असंही लेखात म्हटलं आहे. सिक्कीममधल्या डोंगलांग भागातून भारतीय लष्कर मागे हटल्यास दोन्ही देशांतील तणाव निवळेल, लेखात भारताविरोधात वादग्रस्त भाषेचा वापर करण्यात आला आहे. भारतानं 21व्या शतकातल्या सभ्यतेचा अपमान केल्याचाही आरोप केला आहे. दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं सीमेवर आगळिकीवरून विधान जारी केलं आहे. त्यातही भारताला सिक्कीम भागातून मागे हटण्याची सूचना करण्यात आली आहे.

(सिक्कीम सीमेवर भारतीय लष्करानं वाढवली कुमक)(सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द)

सिक्कीममधल्या डोंगलांग भागातील सीमावादावरचं भारत आणि चीनमधलं वाकयुद्ध अद्यापही सुरूच आहे. भारतानं जर चीनचं ऐकलं नाही, तर चीन स्वतःच्या सैन्याच्या ताकदीचा वापर करेल, असं एका चिनी तज्ज्ञानं यापूर्वीच सांगितलं होतं. डोंगलांगमध्ये दोन्ही देशांमधील वादाचा हा तिसरा आठवडा आहे. दोन्ही देशांमधील हा वाद योग्यरीत्या हाताळला न गेल्यास युद्धाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते, अशा इशारा चीनच्या थिंक टँकनं आधीच दिला होता.
 
भारताला समजावण्याचा चीन कसोशीनं प्रयत्न करत असून, सीमेवर शांती नांदावी यासाठी चीन कटिबद्ध आहे, असंही शांघाई अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेजचे रिसर्चर फेलो हू झियोंग म्हणाले होते. मात्र तरीही भारतानं चीनचं न ऐकल्यास चीनकडे सैन्य शक्तीचा वापर करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीमुळेच भारत चीनला युद्धासाठी भडकावतो आहे. ट्रम्प यांच्या नजरेत भारत चीनशी मुकाबला करण्यासाठी कमकुवत आहे, असंही हू म्हणाले आहेत.