शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

भारतात धोकादायक बियाणं पाठवण्याचा चीनचा कट; केंद्र सरकारचा राज्यांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 11:20 IST

गेल्या काही महिन्यांमध्ये संशयित बियाण्यांचे हजारो पार्सल अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड, जपान आणि काही युरोपियन देशांमध्ये गेले आहेत.

नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये अद्यापही काही प्रमाणात तणाव कायम आहे. अशातच केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाला एक गंभीर इशारा देत सावध राहण्यास सांगितले आहे. केंद्राने राज्यांना, उद्योग आणि संशोधन संस्थांना संशयास्पद आणि अनपेक्षित बियाणांच्या पार्सलबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशाच्या जैवविविधतेसाठी धोकादायक ठरू शकतात असे बियाणे यात असू शकतात, असं इशारा केंद्राने दिला आहे. 

गेल्या काही महिन्यांमध्ये संशयित बियाण्यांचे हजारो पार्सल अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड, जपान आणि काही युरोपियन देशांमध्ये गेले आहेत. या अनपेक्षित पार्सलच्या माध्यमातून साथीचा रोग पसरू शकतो. आणि जर बियान्यांमार्फत साथीचा रोग पसरला तर त्याला नियंत्रणात आणणे अवघड होईल, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील संशोधन आणि उद्योगसंस्थाना विविध कारणामुळे काही बियाण्यांचे पार्सल येतील. जर ते पार्सल अनपेक्षित आणि संशयास्पद असतील तर अशा बियाणांच्या पार्सलबाबत जागृत राहण्याच्या सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत.

याविषयी बोलताना कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, आपण आधीच चीनमधील कोरोनाशी लढाई करत आहोत. आता जर बियाण्यांद्वारे साथीचा रोग आला तर ते हाताळणे कठीण होईल. आपल्याला अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 

बियाण्यांद्वारे वनस्पतींचे रोग पसरवता येतील ही केवळ एक चेतावणी आहे. त्याला 'सीड टेररिजम' म्हणणे योग्य नाही. कारण बियाण्यांद्वारे रोगाचा प्रसार करण्याच्या मर्यादा आहेत. पण तरीही धोका आहे. अशा पार्सलमधून येणारी बियाणे तण असू शकते जी भारतातील मूळ झाडे आणि वनस्पतींसाठी धोकादायक ठरू शकते, असं फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री इन इंडियाचे महासंचालक राम कौदिन्य यांनी सांगितलं.

 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार