शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

डोकलाम प्रश्नावरून चीनचे लष्कर आणि राजकीय नेतृत्वामध्ये मतभेद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 20:58 IST

भारत आणि चिनमध्ये उद्भवलेला डोकलाम विवाद तब्बल सव्वा दोन महिन्यानंतर शांत झाला खरा, पण आता डोकलाम प्रश्नावरू चीनचे लष्कर आणि तेथील राजकीय नेतृत्वामध्ये मदभेद उद्भवले आहेत.

नवी दिल्ली, दि. ७ - भारत आणि चिनमध्ये उद्भवलेला डोकलाम विवाद तब्बल सव्वा दोन महिन्यानंतर शांत झाला खरा, पण आता डोकलाम प्रश्नावरू चीनचे लष्कर आणि तेथील राजकीय नेतृत्वामध्ये मदभेद उद्भवले आहेत. विवादित भागातून दोन्ही देशांचे सैन्य मागे हटल्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात सैन्य केवळ १५० मीटर अजून मागे आले आहे. चिनी लष्कराच्या दबावामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यातच येत आहे. तर चिनचे राजकीय नेतृत्व मात्र हा वाद पूर्णपणे मिटवण्याच्या बाजूने आहे.  १६ जून रोजी भारत, चीन आणि भूतान यांच्या सीमांवर वसलेल्या डोकलाम परिसरात भारत आणि चिनचे लष्कर आमने सामने आले होते. त्यानंतर दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांपासून केवळ १५० मीटर अंतरावर उभे होते. दरम्यान, हा वाद मिटवण्यासाठी आपापले सैन्य मागे घेण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले होते. मात्र दोन्ही देशांचे लष्कर अजून १५० मीटर मागे येऊन उभे राहिल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनचे राजकीय नेतृत्व डोकमालमध्ये १६ जून पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करण्यास तयार आहे. मात्र चीनच्या लष्कराकडून त्यात खोडा घालण्यात येत आहे. चिनी लष्कराच्या दबावामुळेच डोकलाममधून आधी भारताने माघार घ्यावी अशी अट चिनकडून घालण्यात आली होती. भारताने यावर अंमलबजावणी करताना आपल्या सैन्याच्या माघारीची सूचना चिनला दिली. मात्र चिनी सैन्याने आपल्याकडून माघारीची सूचना देण्यास उशीर केला. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर चिनी सैन्य मागे गेले होते. त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य या प्रदेशातून पूर्णपणे माघार कधी घेईल याबाबत काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही.  सिक्कीम बॉर्डरवर भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला वाद अखेर  २८ ऑगस्टला मिटला होत. दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्याची तयारी दर्शवत या वादावर पडदा टाकला होता. जून महिन्यात डोकलामवरुन वाद सुरु झाला होता.  दरम्यान, ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट झाली होती. जवळपास एक तास चाललेल्या या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांनी डोकलामसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यावर सहमती दर्शवली होती. 'सुरक्षा जवानांनी चांगला संपर्क ठेवत काही दिवसांपुर्वी निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे', असे भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी या भेटीनंतर सांगितले होते.