शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

डोकलाम प्रश्नावरून चीनचे लष्कर आणि राजकीय नेतृत्वामध्ये मतभेद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 20:58 IST

भारत आणि चिनमध्ये उद्भवलेला डोकलाम विवाद तब्बल सव्वा दोन महिन्यानंतर शांत झाला खरा, पण आता डोकलाम प्रश्नावरू चीनचे लष्कर आणि तेथील राजकीय नेतृत्वामध्ये मदभेद उद्भवले आहेत.

नवी दिल्ली, दि. ७ - भारत आणि चिनमध्ये उद्भवलेला डोकलाम विवाद तब्बल सव्वा दोन महिन्यानंतर शांत झाला खरा, पण आता डोकलाम प्रश्नावरू चीनचे लष्कर आणि तेथील राजकीय नेतृत्वामध्ये मदभेद उद्भवले आहेत. विवादित भागातून दोन्ही देशांचे सैन्य मागे हटल्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात सैन्य केवळ १५० मीटर अजून मागे आले आहे. चिनी लष्कराच्या दबावामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यातच येत आहे. तर चिनचे राजकीय नेतृत्व मात्र हा वाद पूर्णपणे मिटवण्याच्या बाजूने आहे.  १६ जून रोजी भारत, चीन आणि भूतान यांच्या सीमांवर वसलेल्या डोकलाम परिसरात भारत आणि चिनचे लष्कर आमने सामने आले होते. त्यानंतर दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांपासून केवळ १५० मीटर अंतरावर उभे होते. दरम्यान, हा वाद मिटवण्यासाठी आपापले सैन्य मागे घेण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले होते. मात्र दोन्ही देशांचे लष्कर अजून १५० मीटर मागे येऊन उभे राहिल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनचे राजकीय नेतृत्व डोकमालमध्ये १६ जून पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करण्यास तयार आहे. मात्र चीनच्या लष्कराकडून त्यात खोडा घालण्यात येत आहे. चिनी लष्कराच्या दबावामुळेच डोकलाममधून आधी भारताने माघार घ्यावी अशी अट चिनकडून घालण्यात आली होती. भारताने यावर अंमलबजावणी करताना आपल्या सैन्याच्या माघारीची सूचना चिनला दिली. मात्र चिनी सैन्याने आपल्याकडून माघारीची सूचना देण्यास उशीर केला. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर चिनी सैन्य मागे गेले होते. त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य या प्रदेशातून पूर्णपणे माघार कधी घेईल याबाबत काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही.  सिक्कीम बॉर्डरवर भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला वाद अखेर  २८ ऑगस्टला मिटला होत. दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्याची तयारी दर्शवत या वादावर पडदा टाकला होता. जून महिन्यात डोकलामवरुन वाद सुरु झाला होता.  दरम्यान, ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट झाली होती. जवळपास एक तास चाललेल्या या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांनी डोकलामसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यावर सहमती दर्शवली होती. 'सुरक्षा जवानांनी चांगला संपर्क ठेवत काही दिवसांपुर्वी निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे', असे भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी या भेटीनंतर सांगितले होते.