शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
3
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
4
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
5
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
6
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
7
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
8
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
10
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...
11
झांबियामध्ये १९ कोटी रुपये अन् ४ कोटींचे सोने घेऊन जाताना भारतीयाला पकडले; दुबईला जाण्याच्या तयारीत होता
12
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
13
IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट
14
मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा
15
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
16
वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळाने गुगलचे सीईओही भारावले, सुंदर पिचाई कौतुक करत म्हणाले, "वयाच्या १४ व्या वर्षी…’’  
17
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
19
पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...
20
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी

पाकिस्तानच नाही, भारताच्या चिकन नेकपर्यंत चीनही पोहोचणार; बांगलादेश रचतोय मोठे कारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:57 IST

India Vs Bangladesh: बांगलादेशची धुरा हाती घेतल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी भारतविरोधी कृत्ये करण्यास सुरुवात केली आहे. आता तर त्यांनी तिस्ता प्रोजेक्टमध्ये चीनला सहभागी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

भारताला ईशान्येकडील राज्यांना जोडणारा भूभाग म्हणजेच अत्यंत निमुळता प्रदेश असलेला चिकन नेक आहे. या राज्यांवर चीनचा डोळा आहे. कारण ही राज्ये भारतापासून लांब तर आहेतच परंतू बांगलादेशच्या पलिकडे आणि चीन-भुटान-म्यानमारला जोडून आहेत. या चिकन नेकजवळ काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना बांगलादेशने नेले होते. ही भारतासाठी चिंतेची बाब असतानाच आता आणखी एक मोठी घडामोड समोर येत आहे. या चिकन नेकजवळ चीनला हस्तक्षेप करण्यास देण्याचे कारस्थान बांगलादेश रचत आहे. 

बांगलादेशची धुरा हाती घेतल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी भारतविरोधी कृत्ये करण्यास सुरुवात केली आहे. आता तर त्यांनी तिस्ता प्रोजेक्टमध्ये चीनला सहभागी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. तिस्ता नदीच्या संरक्षण आणि नियोजनासाठीच्या विविध योजनांसाठी बांगलादेश चीनला त्यात सहभागी करण्याची शक्यता असलेले वृत्त टेलिग्राफने दिले आहे. युनूस यांनी यासाठी लोकांची सहमती मिळविण्यासाठी सार्वजनिक सुनावणीचा प्रस्ताव ठेवला आहे. 

ही नदी सिक्कीममधून उगम पावते आणि हिमालयीन राज्य आणि उत्तर बंगालच्या काही भागांमधून सुमारे ३०५ किमी अंतर पार करून बांगलादेशात प्रवेश करते. तिस्ता प्रकल्पावरून भारत आणि बांगलादेशमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरु आहे. याचा फायदा आता युनूस सरकार घेणार आहे. शेख हसीना यांच्या सरकारने चीनला या प्रकल्पापासून दूर ठेवले होते परंतू युनूस चीनला रेड कार्पेट घालत आहेत. हसिना यांच्या काळातच चीनने याचा मास्टर प्लॅन तयार केला होता. परंतू, भारताने आक्षेप नोंदविल्यानंतर हसिना यांनी चीनचा प्लॅन बाजुला केला होता. तोच आता पुन्हा उकरण्यात आला असून त्यावर चर्चा करण्यात येत आहे. या प्लॅनवर चीनने दोन वर्षांचा वेळ मागितला आहे. 

तिस्ता नदीच्या तटावर राहणाऱ्या लोकांची जनसुनावणी घेण्यात आली. सईदा रिजवाना हसन यांच्या हवाल्याने बांगलादेशी मीडियाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. सिलिगुडी कॉरिडॉरला भारताचे चिकन नेक म्हटले जाते. हा भाग नेपाळ आणि बांगलादेश दरम्यान स्थित आहे आणि संपूर्ण ईशान्येला देशाच्या उर्वरित भागाशी जोडतो. चीनला बांगलादेश सिलिगुडीपासून अवघ्या १०० किमीवर प्रवेश देणार आहे. हा भारतासाठी धोका मानला जात आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतchinaचीन