शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रशियानं यूक्रेनमध्ये जे केले तसं चीनही भारतात करेल?; राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:26 IST

सरकार सत्य स्वीकारत नाही. जर सत्य स्वीकारलं नाही आणि तयारी केली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते असं राहुल गांधी म्हणाले.

नवी दिल्ली – गेल्या महिनाभरापासून रशिया आणि यूक्रेन(Russia Ukraine) यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. त्यातच यूक्रेन संकटाचा हवाला देत काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी(Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारला सतर्क केले आहे. रशियासारखं कृत्य चीनदेखील करू शकते. स्वत: सरकारने हे मान्य केले की, चीननं देशातील पॉवर ग्रीड हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, मागील ४ महिन्यात तीन वेळा चीनने असा प्रयत्न केला परंतु त्यांचा हेतू साध्य झाला नाही. चीनच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष संसदेत चर्चा करू इच्छित होता परंतु ते झाले नाही. रशिया म्हणतो, डोन्सात्क, लुहान्स्क हा भाग यूक्रेनचा नाही. त्यामुळे रशियाने यूक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्याचं टार्गेट नाटो, यूक्रेन आणि अमेरिकेशी भागीदारी तोडण्याचं होते. तसेच चीनही भारतासोबत करू शकते. लडाख आणि अरुणचाल प्रदेश तुमचं नाही, भारताचं सैन्य त्याठिकाणी आहे. सरकारकडे याकडे दुर्लक्ष करत आहे. पण चीनने ते याठिकाणीही लागू करू शकते असं ते म्हणाले.

तसेच सरकार सत्य स्वीकारत नाही. जर सत्य स्वीकारलं नाही आणि तयारी केली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते. तेव्हा तुम्ही रिएक्टही होऊ शकणार नाही असं सांगत राहुल गांधींनी इतर मुद्यावरूनही सरकारला टार्गेट केले. ज्या देशात शांतता नाही तिथे महागाई वाढत राहणार, द्वेष वाढत जाणार. आर्थिक धोरण चालवू शकत नाही. रोजगारही मिळणार नाही. जर देशाला मजबूत ठेवायचं असेल तर शांतता हवी. द्वेष पसरवून, लोकांना घाबरवून, मारून देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत करत येत नाही असं राहुल गांधींनी म्हटलं.

देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होत आहे का?

या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या आर्थिक स्थितीची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. जे भविष्यात येणार आहे ते तुम्ही आयुष्यात पाहिले नसेल. कारण देशातील रोजगार व्यवस्थेचा कणाच मोडकळीस आलेला आहे. जे छोटे मध्यम व्यवसाय, छोटी दुकाने, अनौपचारिक क्षेत्र चालवतात, ते आर्थिक कणा आहेत. मात्र याला काही अर्थ नाही असं मोठमोठे अर्थतज्ञ आणि नोकरशहांना वाटतं. ते इतर देश बघून आपली योजना बनवतात. दक्षिण कोरियाने जे केले, ते आपणही केले पाहिजे, असे पंतप्रधानांच्या मनात आहे. ते बाहेर पाहतात. तसं काम करू शकत नाही. आपण कोण आहोत आणि इथे काय चालले आहे हे ओळखले पाहिजे. हा आर्थिक कणा त्यांनी मोडला आहे, त्याचा परिणाम येत्या दोन-तीन-चार वर्षात समोर येईल आणि भयानक परिणाम येतील अशीही भीती राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.   

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया