शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

रशियानं यूक्रेनमध्ये जे केले तसं चीनही भारतात करेल?; राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:26 IST

सरकार सत्य स्वीकारत नाही. जर सत्य स्वीकारलं नाही आणि तयारी केली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते असं राहुल गांधी म्हणाले.

नवी दिल्ली – गेल्या महिनाभरापासून रशिया आणि यूक्रेन(Russia Ukraine) यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. त्यातच यूक्रेन संकटाचा हवाला देत काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी(Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारला सतर्क केले आहे. रशियासारखं कृत्य चीनदेखील करू शकते. स्वत: सरकारने हे मान्य केले की, चीननं देशातील पॉवर ग्रीड हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, मागील ४ महिन्यात तीन वेळा चीनने असा प्रयत्न केला परंतु त्यांचा हेतू साध्य झाला नाही. चीनच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष संसदेत चर्चा करू इच्छित होता परंतु ते झाले नाही. रशिया म्हणतो, डोन्सात्क, लुहान्स्क हा भाग यूक्रेनचा नाही. त्यामुळे रशियाने यूक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्याचं टार्गेट नाटो, यूक्रेन आणि अमेरिकेशी भागीदारी तोडण्याचं होते. तसेच चीनही भारतासोबत करू शकते. लडाख आणि अरुणचाल प्रदेश तुमचं नाही, भारताचं सैन्य त्याठिकाणी आहे. सरकारकडे याकडे दुर्लक्ष करत आहे. पण चीनने ते याठिकाणीही लागू करू शकते असं ते म्हणाले.

तसेच सरकार सत्य स्वीकारत नाही. जर सत्य स्वीकारलं नाही आणि तयारी केली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते. तेव्हा तुम्ही रिएक्टही होऊ शकणार नाही असं सांगत राहुल गांधींनी इतर मुद्यावरूनही सरकारला टार्गेट केले. ज्या देशात शांतता नाही तिथे महागाई वाढत राहणार, द्वेष वाढत जाणार. आर्थिक धोरण चालवू शकत नाही. रोजगारही मिळणार नाही. जर देशाला मजबूत ठेवायचं असेल तर शांतता हवी. द्वेष पसरवून, लोकांना घाबरवून, मारून देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत करत येत नाही असं राहुल गांधींनी म्हटलं.

देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होत आहे का?

या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या आर्थिक स्थितीची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. जे भविष्यात येणार आहे ते तुम्ही आयुष्यात पाहिले नसेल. कारण देशातील रोजगार व्यवस्थेचा कणाच मोडकळीस आलेला आहे. जे छोटे मध्यम व्यवसाय, छोटी दुकाने, अनौपचारिक क्षेत्र चालवतात, ते आर्थिक कणा आहेत. मात्र याला काही अर्थ नाही असं मोठमोठे अर्थतज्ञ आणि नोकरशहांना वाटतं. ते इतर देश बघून आपली योजना बनवतात. दक्षिण कोरियाने जे केले, ते आपणही केले पाहिजे, असे पंतप्रधानांच्या मनात आहे. ते बाहेर पाहतात. तसं काम करू शकत नाही. आपण कोण आहोत आणि इथे काय चालले आहे हे ओळखले पाहिजे. हा आर्थिक कणा त्यांनी मोडला आहे, त्याचा परिणाम येत्या दोन-तीन-चार वर्षात समोर येईल आणि भयानक परिणाम येतील अशीही भीती राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.   

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया