शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कोको बेटावरून चीनची पाळत, भारताला धाेका; ड्रॅगनची तिरकी चाल, धावपट्टीही बांधली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 06:48 IST

पूर्व लडाखच्या मुद्द्यावरून भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच आता चीनने नवी खेळी केली आहे.

नवी दिल्ली :

पूर्व लडाखच्या मुद्द्यावरून भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच आता चीनने नवी खेळी केली आहे. बंगालच्या खाडीमधील अंदमान बेटांपासून अवघ्या साठ किमी अंतरावर असलेल्या म्यानमारमधील कोको बेटावरून भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या आहेत. कोको बेटावर चीनने विमानासाठी धावपट्टी बांधली आहे. हेरगिरी करण्यासाठी तिथे चीनकडून उपकरणे बसविण्यात येत असल्याचे वृत्त आहे. चीनच्या या हालचालींवर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. 

कोको बेटावरून चीनला भारताच्या पूर्व किनारपट्टीवर, तसेच हिंद महासागराच्या मोठ्या प्रदेशावर पाळत ठेवता येईल. याच भागात भारताचे क्षेपणास्त्र चाचणी केंद्र आहे. इथे होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्यांची माहिती त्वरित मिळविण्यासाठी चीनकडून प्रयत्न सुरू असतात. चीनच्या वाढलेल्या हालचालींची माहिती भारताने म्यानमार सरकारला दिली आहेत. मात्र, म्यानमार सरकारने याचा इन्कार केला आहे. (वृत्तसंस्था)

लंकेमध्येही आता चीनचा रडार तळचीन आता श्रीलंकेतील डोंडरा बे येथील जंगलक्षेत्रात रडार तळ उभारत असल्याचे वृत्त आहे. हिंद महासागरातील भारताच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी या रडार यंत्रणेचा उपयोग केला जाईल. डोंडरा बे येथील रडार यंत्रणेद्वारे दक्षिण भारतातील सर्व प्रदेश, तेथील कुडनकुलम, कलपक्कम अणुऊर्जा प्रकल्प, श्रीहरिकोटा येथील स्पेस स्टेशन, अंदमान-निकोबार बेट यावर चीनला  नजर ठेवता येईल. 

‘भारत सुरक्षेसाठी पावले उचलणार’1. कोको बेटावरील चीनच्या हालचाली पाहता भारत आपल्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलेल, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नुकतेच सांगितले होते. 2. याबद्दल म्यानमारमधील चीनच्या राजदुताने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. म्यानमारने चीनला कोको बेटावर हेरगिरीसाठी उपकरणे उभारण्याची १९९० साली परवानगी दिली होती. 

चीन सीमेजवळील गावाला गृहमंत्री शाह देणार भेट- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १० आणि ११ एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेशला भेट देणार असून, त्यादरम्यान ते भारत-चीन सीमेवरील किबिथू या गावात ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’ची सुरुवात करतील. - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ साठी विशेषत: रस्तेजोडणीसाठी २५०० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. - ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’अंतर्गत ४८०० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे.ही केंद्र सरकारपुरस्कृत योजना आहे. सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे. -  चीनने अरुणाचलातील काही गावांचे नाव बदलण्याची कुरापत केली हाेती. त्या पार्श्वभूमीवर शाह यांची भेट महत्त्वाची मानली जाते.

टॅग्स :chinaचीन