शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

'सुरुवातीपासूनच चीनचे दावे हास्यास्पद', अरुणाचलवर दावा सांगणाऱ्या ड्रॅगनला जयशंकर यांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 19:27 IST

सिंगापूरच्या भूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं.

सिंगापूरच्या भूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगितल्याबद्दल परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला जोरदार फटकारलं. भारत पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये दहशतवादाकडे कधीही दुर्लक्ष करू शकत नाही, असंही जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितलं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. येथे ते युद्ध स्मारकावर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना श्रद्धांजली वाहतील. 

अरुणाचलवरील दावा हास्यास्पद 

अरुणाचल प्रदेशवरील चीनचे दावे सुरुवातीलाही हास्यास्पद होते आणि आजही हास्यास्पद आहेत, कारण तो भारताचा नैसर्गिक भूभाग आहे, असं म्हणत जयशंकर यांनी चीनला सडेतोड उत्तर दिलं. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या (NUS) इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीज (ISAS) येथे 'व्हाय इंडिया मॅटर्स' या पुस्तकावरील व्याख्यानानंतर आयोजित प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान जयशंकर यांनी यावर भाष्य केलं. 

चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जयशंकर टिप्पणी आली आहे. अलीकडेच, चिनी लष्करानं अरुणाचल प्रदेश हा चीनचा नैसर्गिक भाग असल्याचं म्हटलं होतं. नंतर एका निवेदनात, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दावे खोडून काढले आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं म्हटलं. 

पाकिस्तानवरही हल्लाबोल 

दरम्यान, यावेळी पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्याच्या मुद्द्यावरही जयशंकर यांनी भाष्य केलं. "पाकिस्तान आता जवळपास औद्योगिक स्तरावर दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. अशातच दहशतवादाकडे दुर्लक्ष करण्याच्या स्थितीत भारत नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादावर बोलताना, त्यांनी ही क्षणार्धात होणारी घटना नाही. ही निरंतर चालत राहते. त्या ते ठिकाणी जवळपास उद्योग स्तरावर सामील आहे. त्यामुळे धोक्याचा सामना करण्यासाठी एक पद्धत शोधावी लागणार असल्याच्या निष्कर्षावर आम्ही पोहोचलो आहोत, असंही जयशंकर यांनी नमूद केलं. 

भारताला एक स्थिर शेजारी हवा आहे. दुसरं काही नाही तर तुम्हाला किमान शांततापूर्ण शेजारी हवा असतो, असं एका प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले.

टॅग्स :chinaचीनS. Jaishankarएस. जयशंकरArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशPakistanपाकिस्तान