शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

"काँग्रेसमुळे देशाचे नुकसान, ८० च्या दशकापासून चीनचा भारतीय जागेवर कब्जा"; भाजप खासदार

By देवेश फडके | Updated: January 19, 2021 13:25 IST

अरुणाचल प्रदेशजवळ चीनकडून गावे वसवली जात असल्याबाबत येथील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार तापिर गाओ यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्दे८० च्या दशकांपासून चीनचा भारतीय भूभागावर कब्जागावे वसवणे ही बाब नवीन नाही - भाजप खासदाराचा दावाकाँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचे नुकसान - भाजप खासदाराचा आरोप

ईटानगर :अरुणाचल प्रदेशजवळचीनकडून गावे वसवली जात असल्याबाबत येथील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार तापिर गाओ यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या धोरणांमुळे संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे, असे गाओ यांनी सांगितले. 

८० च्या दशकापासून चीन सतत भारतीय भूभागांवर कब्जा करत आहे. चीनकडून गावे वसवणे, लष्करी छावणी बांधणे ही काही नवीन गोष्ट नाही. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे संपूर्ण देशाला याची किंमत मोजावी लागत आहे, असा आरोप गाओ यांनी केला आहे. 

अरुणाचल प्रदेशमधील सीमेपर्यंत पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याचे काम काँग्रेस सरकारकडून करण्यात आलेले नाही. यामुळे तीन ते चार किलोमीटरचा बफर झोन सुटला. यावर आता चीनकडून कब्जा केला जात असल्याचा दावा खासदार गाओ यांनी केला. उलटपक्षी, चीनने ८० दशकांपासून या भागात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला. एवढेच नव्हे, तर लोंग्जू आणि माजा या भागापर्यंत रस्ते बांधणी केली, असेही गाओ यांनी सांगितले.  

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या कार्यकाळात चीनने तवांग येथील सुमदोरोंग चू खोऱ्यावर ताबा मिळवला. तत्कालीन सैन्य प्रमुखांनी एका मोहिमेची आखणीही केली होती. मात्र, सरकारने त्यांना परवानगी दिली नाही, असे गाओ यांनी सांगितले. 

दरम्यान, लडाख ते अरुणाचल प्रदेश या भागात असलेल्या सीमेवर चीनकडून सातत्याने कुरापती काढण्यात येत असून, या भागात निश्चित सीमारेषा नसल्याने चिनी सैन्याकडून या भागात सातत्याने घुसखोरी होत असते. अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी करून चक्क एक गाव वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गावामध्ये सुमारे १०१ घरे असल्याचे दिसत आहेत. हे गाव भारताच्या प्रत्यक्ष सीमेपासून साडे चार किलोमीटर आत वसले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndiaभारतchinaचीनborder disputeसीमा वाद