शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

LAC वादासंदर्भात काय आहे चीनचा हेतू ? लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 12:01 IST

Army Chief General Manoj Pande : सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन यांच्यात जवळपास दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. आता लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (Army Chief General Manoj Pande) यांनी तेथील सध्याच्या परिस्थितीवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. ते म्हणाले की, चीनसोबतचा मूळ प्रश्न हाच सीमाप्रश्नावर तोडगा आहे, पण तो कायम ठेवण्याचा त्यांचा हेतू आहे. दरम्यान, जनरल मनोज पांडे यांनी एक आठवड्यापूर्वी भारतीय लष्कराची कमान हाती घेतली आहे.

सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. तसेच, एप्रिल 2020 पूर्वी पूर्वस्थिती पूर्ववत करणे हे भारतीय लष्कराचे उद्दिष्ट आहे आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना त्यांच्या कामात ठाम राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले. 

भारतीय लष्कर वास्तविक नियंत्रण रेषेवर महत्त्वात्या ठिकाणी तैनात आहे. लष्कर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. सीमेचे निराकरण हा मुख्य मुद्दा आहे. सीमाप्रश्न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू असल्याचे आपण पाहतो. एक देश म्हणून आपल्याला 'संपूर्ण राष्ट्र' दृष्टीकोन आवश्यक आहे आणि लष्करी क्षेत्रात, वास्तविक नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना रोखणे आणि त्याचा प्रतिकार करायचा आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. 

"चर्चेतून तोडगा निघेल, अशी आशा"याचबरोबर, भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक आणि लष्करी चर्चेच्या परिणामी पॅंगॉन्ग लेक, गोगरा आणि गलवान येथील पेट्रोल सेंटर 14 च्या उत्तर आणि दक्षिण सीमेवरील सैन्य हटविण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले. यासोबतच ते म्हणाले, 'उर्वरित क्षेत्रातही चर्चेतून तोडगा निघेल, अशी आशा आहे. दोन्ही बाजूंमध्ये विश्वास आणि शांतता प्रस्थापित करण्याचा उद्देश आहे, परंतु ते एका बाजूने होऊ शकत नाही.'  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव