शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

LAC वादासंदर्भात काय आहे चीनचा हेतू ? लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 12:01 IST

Army Chief General Manoj Pande : सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन यांच्यात जवळपास दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. आता लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (Army Chief General Manoj Pande) यांनी तेथील सध्याच्या परिस्थितीवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. ते म्हणाले की, चीनसोबतचा मूळ प्रश्न हाच सीमाप्रश्नावर तोडगा आहे, पण तो कायम ठेवण्याचा त्यांचा हेतू आहे. दरम्यान, जनरल मनोज पांडे यांनी एक आठवड्यापूर्वी भारतीय लष्कराची कमान हाती घेतली आहे.

सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. तसेच, एप्रिल 2020 पूर्वी पूर्वस्थिती पूर्ववत करणे हे भारतीय लष्कराचे उद्दिष्ट आहे आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना त्यांच्या कामात ठाम राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले. 

भारतीय लष्कर वास्तविक नियंत्रण रेषेवर महत्त्वात्या ठिकाणी तैनात आहे. लष्कर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. सीमेचे निराकरण हा मुख्य मुद्दा आहे. सीमाप्रश्न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू असल्याचे आपण पाहतो. एक देश म्हणून आपल्याला 'संपूर्ण राष्ट्र' दृष्टीकोन आवश्यक आहे आणि लष्करी क्षेत्रात, वास्तविक नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना रोखणे आणि त्याचा प्रतिकार करायचा आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. 

"चर्चेतून तोडगा निघेल, अशी आशा"याचबरोबर, भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक आणि लष्करी चर्चेच्या परिणामी पॅंगॉन्ग लेक, गोगरा आणि गलवान येथील पेट्रोल सेंटर 14 च्या उत्तर आणि दक्षिण सीमेवरील सैन्य हटविण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले. यासोबतच ते म्हणाले, 'उर्वरित क्षेत्रातही चर्चेतून तोडगा निघेल, अशी आशा आहे. दोन्ही बाजूंमध्ये विश्वास आणि शांतता प्रस्थापित करण्याचा उद्देश आहे, परंतु ते एका बाजूने होऊ शकत नाही.'  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव