शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

LAC वादासंदर्भात काय आहे चीनचा हेतू ? लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 12:01 IST

Army Chief General Manoj Pande : सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन यांच्यात जवळपास दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. आता लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (Army Chief General Manoj Pande) यांनी तेथील सध्याच्या परिस्थितीवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. ते म्हणाले की, चीनसोबतचा मूळ प्रश्न हाच सीमाप्रश्नावर तोडगा आहे, पण तो कायम ठेवण्याचा त्यांचा हेतू आहे. दरम्यान, जनरल मनोज पांडे यांनी एक आठवड्यापूर्वी भारतीय लष्कराची कमान हाती घेतली आहे.

सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. तसेच, एप्रिल 2020 पूर्वी पूर्वस्थिती पूर्ववत करणे हे भारतीय लष्कराचे उद्दिष्ट आहे आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना त्यांच्या कामात ठाम राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले. 

भारतीय लष्कर वास्तविक नियंत्रण रेषेवर महत्त्वात्या ठिकाणी तैनात आहे. लष्कर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. सीमेचे निराकरण हा मुख्य मुद्दा आहे. सीमाप्रश्न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू असल्याचे आपण पाहतो. एक देश म्हणून आपल्याला 'संपूर्ण राष्ट्र' दृष्टीकोन आवश्यक आहे आणि लष्करी क्षेत्रात, वास्तविक नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना रोखणे आणि त्याचा प्रतिकार करायचा आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. 

"चर्चेतून तोडगा निघेल, अशी आशा"याचबरोबर, भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक आणि लष्करी चर्चेच्या परिणामी पॅंगॉन्ग लेक, गोगरा आणि गलवान येथील पेट्रोल सेंटर 14 च्या उत्तर आणि दक्षिण सीमेवरील सैन्य हटविण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले. यासोबतच ते म्हणाले, 'उर्वरित क्षेत्रातही चर्चेतून तोडगा निघेल, अशी आशा आहे. दोन्ही बाजूंमध्ये विश्वास आणि शांतता प्रस्थापित करण्याचा उद्देश आहे, परंतु ते एका बाजूने होऊ शकत नाही.'  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव