शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

सिक्कीमनंतर आता उत्तराखंडमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 17:39 IST

सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्यामधील संघर्ष कायम असताना आता उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चिनी सैन्याचे घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देचिनी सैनिक भारतीय हद्दीत एक किलोमीटर आतपर्यंत आले होते. भारत-चीन आणि भूतानची सीमा रेषा ज्या ट्राय जंक्शनवर मिळते तिथेही चीनने अशाच प्रकारची घुसखोरी केली आहे. जुलै महिन्यात दोन चिनी सैनिक बारहोलीमध्ये दोनशे मीटर आतपर्यंत आले होते.

नवी दिल्ली, दि. 31 - सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्यामधील संघर्ष कायम असताना आता उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चिनी सैन्याचे घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. टाइम्स नाऊ वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार चिनी सैनिक भारतीय हद्दीत एक किलोमीटर आतपर्यंत आले होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या बिजींग भेटीच्या दोन दिवस आधी ही घटना घडली. 

सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये भारत-चीन आणि भूतानची सीमा रेषा ज्या ट्राय जंक्शनवर मिळते तिथेही चीनने अशाच प्रकारची घुसखोरी केली आहे. भारताने चीनला इथे रस्ते बांधणीपासून रोखले असून, मागच्या महिन्याभरापासून दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. उत्तराखंडमध्ये घुसखोरीची घटना 25 जुलैला सकाळी नऊच्या सुमारास घडली. चिनी सैनिक भारतीय हद्दीत एक किलोमीटर आतपर्यंत घुसले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मागच्यावर्षी सुद्धा जुलै महिन्यात दोन चिनी सैनिक बारहोलीमध्ये दोनशे मीटर आतपर्यंत आले होते. त्यावेळी तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दोन्ही देशांमध्ये सीमारेषेची आखणी झाली नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे भारताने त्यावेळी या घटनेला घुसखोरी न ठरवता उल्लंघन म्हटले होते. एनएसए अजित डोवाल यांनी चिनी अधिका-यांची भेट घेतली पण अजूनही डोकलाममध्ये निर्माण झालेला तिढा सुटलेला नाही. 

चीनची दादागिरी नाही खपवून घेणार चीनकडून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात असली तरी, भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.  डोकलाममध्ये निर्माण झालेला वाद राजकीय आणि कुटनितीक चर्चेतून सोडवण्याचा भारताचा प्रयत्न चालू राहिल पण त्याचवेळी चीनने भूतानवर दादागिरीचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. चीनच्या भूतानवरील कोणत्याही दडपशाहीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची भारताची रणनिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

11 हजार फूट उंचीवर सिक्कीम-भूतान-तिबेट ट्राय जंक्शनवर हळूहळू भारताने आपली स्थिती मजबूत केली आहे. परिस्थिती आणि गरजेनुसार इथे अतिरिक्त सैन्य तुकडीची तैनाती केली जाईल. चीनच्या सरकारी माध्यमांमधून दररोज भारताला धमक्या, इशारे दिले जात असले तरी, भारताने कुटनितिक चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. ट्राय जंक्शन येथे असलेल्या डोकलाममध्ये चीनने रस्ते बांधणीचा प्रयत्न केल्यापासून या भागातील शांतता भंग पावली आहे.