शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

सिक्कीमनंतर आता उत्तराखंडमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 17:39 IST

सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्यामधील संघर्ष कायम असताना आता उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चिनी सैन्याचे घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देचिनी सैनिक भारतीय हद्दीत एक किलोमीटर आतपर्यंत आले होते. भारत-चीन आणि भूतानची सीमा रेषा ज्या ट्राय जंक्शनवर मिळते तिथेही चीनने अशाच प्रकारची घुसखोरी केली आहे. जुलै महिन्यात दोन चिनी सैनिक बारहोलीमध्ये दोनशे मीटर आतपर्यंत आले होते.

नवी दिल्ली, दि. 31 - सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्यामधील संघर्ष कायम असताना आता उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चिनी सैन्याचे घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. टाइम्स नाऊ वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार चिनी सैनिक भारतीय हद्दीत एक किलोमीटर आतपर्यंत आले होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या बिजींग भेटीच्या दोन दिवस आधी ही घटना घडली. 

सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये भारत-चीन आणि भूतानची सीमा रेषा ज्या ट्राय जंक्शनवर मिळते तिथेही चीनने अशाच प्रकारची घुसखोरी केली आहे. भारताने चीनला इथे रस्ते बांधणीपासून रोखले असून, मागच्या महिन्याभरापासून दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. उत्तराखंडमध्ये घुसखोरीची घटना 25 जुलैला सकाळी नऊच्या सुमारास घडली. चिनी सैनिक भारतीय हद्दीत एक किलोमीटर आतपर्यंत घुसले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मागच्यावर्षी सुद्धा जुलै महिन्यात दोन चिनी सैनिक बारहोलीमध्ये दोनशे मीटर आतपर्यंत आले होते. त्यावेळी तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दोन्ही देशांमध्ये सीमारेषेची आखणी झाली नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे भारताने त्यावेळी या घटनेला घुसखोरी न ठरवता उल्लंघन म्हटले होते. एनएसए अजित डोवाल यांनी चिनी अधिका-यांची भेट घेतली पण अजूनही डोकलाममध्ये निर्माण झालेला तिढा सुटलेला नाही. 

चीनची दादागिरी नाही खपवून घेणार चीनकडून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात असली तरी, भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.  डोकलाममध्ये निर्माण झालेला वाद राजकीय आणि कुटनितीक चर्चेतून सोडवण्याचा भारताचा प्रयत्न चालू राहिल पण त्याचवेळी चीनने भूतानवर दादागिरीचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. चीनच्या भूतानवरील कोणत्याही दडपशाहीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची भारताची रणनिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

11 हजार फूट उंचीवर सिक्कीम-भूतान-तिबेट ट्राय जंक्शनवर हळूहळू भारताने आपली स्थिती मजबूत केली आहे. परिस्थिती आणि गरजेनुसार इथे अतिरिक्त सैन्य तुकडीची तैनाती केली जाईल. चीनच्या सरकारी माध्यमांमधून दररोज भारताला धमक्या, इशारे दिले जात असले तरी, भारताने कुटनितिक चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. ट्राय जंक्शन येथे असलेल्या डोकलाममध्ये चीनने रस्ते बांधणीचा प्रयत्न केल्यापासून या भागातील शांतता भंग पावली आहे.