शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चीननं भारतीय सीमेवर गुपचूप वसवली ६२४ गावं; ड्रॅगनचा पुढचा डाव काय? धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 12:02 IST

भारत आणि चीनमध्ये सीमा वाद सुरू असताना चीनची वेगळीच चाल

बीजिंग: भारतासोबत असलेल्या सीमावादात कुरघोडी करण्यासाठी चीन वेगळीच चाल खेळला आहे. चीननं हिमालयाच्या कुशीत ६२४ गावं वसवली आहेत. वादग्रस्त सीमेच्या आत किंवा बळकावलेल्या भागात चीननं गाव वसवल्याचं बोललं जात आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर २०१७ मध्ये या गावांचं काम सुरू झालं होतं. 

चिनी सरकारनं २०२१ मध्ये गावांचं बांधकाम पूर्ण केल्याची माहिती संरक्षणतज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी चीन सरकारचं संकेतस्थळ असलेल्या तिबेट डॉट सीएनच्या हवाल्यानं दिली आहे. भारतात निवडणुका आणि अंतर्गत राजकारण सुरू असताना चीननं भारताला लागून असलेल्या सीमेवर ६२४ गावं वसवली. तिबेटीमधील गुराख्यांना सीमेवर वसवण्यात यावं असे आदेश चिनी अध्यक्षांनी २०१७ मध्ये दिले होते.

तिबेटमध्ये उभारण्यात आलेल्या गावांमध्ये वीज, इंटरनेट, पाणी आणि पक्के रस्ते बांधण्यात आल्याचा दावा चीननं केला आहे. सोयी सुविधा आल्यानं या भागात समृद्धी, स्थिरता आल्याचं चीननं सांगितलं. या गावांना पॉवर ग्रीडनं जोडण्यात आलं आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे. 

चीननं उभारलेली ६२४ गावं बरीच दूर आहेत. तिथली परिस्थिती राहण्यासाठी फारशी अनुकूल नाही. त्यामुळे चिनी सरकार विविध प्रकारच्या सुविधा देऊन सीमावर्ती भागात स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत आहे. इथे राहण्यास येणाऱ्या लोकांना वर्षाकाठी ३० हजार युआन दिले जात असल्याचं वृत्त तिबेट डेलीनं दिलं आहे. भारतीय चलनात बोलायचं झाल्यास ही रक्कम साडे तीन लाखांच्या घरात जाते.

टॅग्स :chinaचीन