शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चीननं भारतीय सीमेवर गुपचूप वसवली ६२४ गावं; ड्रॅगनचा पुढचा डाव काय? धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 12:02 IST

भारत आणि चीनमध्ये सीमा वाद सुरू असताना चीनची वेगळीच चाल

बीजिंग: भारतासोबत असलेल्या सीमावादात कुरघोडी करण्यासाठी चीन वेगळीच चाल खेळला आहे. चीननं हिमालयाच्या कुशीत ६२४ गावं वसवली आहेत. वादग्रस्त सीमेच्या आत किंवा बळकावलेल्या भागात चीननं गाव वसवल्याचं बोललं जात आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर २०१७ मध्ये या गावांचं काम सुरू झालं होतं. 

चिनी सरकारनं २०२१ मध्ये गावांचं बांधकाम पूर्ण केल्याची माहिती संरक्षणतज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी चीन सरकारचं संकेतस्थळ असलेल्या तिबेट डॉट सीएनच्या हवाल्यानं दिली आहे. भारतात निवडणुका आणि अंतर्गत राजकारण सुरू असताना चीननं भारताला लागून असलेल्या सीमेवर ६२४ गावं वसवली. तिबेटीमधील गुराख्यांना सीमेवर वसवण्यात यावं असे आदेश चिनी अध्यक्षांनी २०१७ मध्ये दिले होते.

तिबेटमध्ये उभारण्यात आलेल्या गावांमध्ये वीज, इंटरनेट, पाणी आणि पक्के रस्ते बांधण्यात आल्याचा दावा चीननं केला आहे. सोयी सुविधा आल्यानं या भागात समृद्धी, स्थिरता आल्याचं चीननं सांगितलं. या गावांना पॉवर ग्रीडनं जोडण्यात आलं आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे. 

चीननं उभारलेली ६२४ गावं बरीच दूर आहेत. तिथली परिस्थिती राहण्यासाठी फारशी अनुकूल नाही. त्यामुळे चिनी सरकार विविध प्रकारच्या सुविधा देऊन सीमावर्ती भागात स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत आहे. इथे राहण्यास येणाऱ्या लोकांना वर्षाकाठी ३० हजार युआन दिले जात असल्याचं वृत्त तिबेट डेलीनं दिलं आहे. भारतीय चलनात बोलायचं झाल्यास ही रक्कम साडे तीन लाखांच्या घरात जाते.

टॅग्स :chinaचीन