शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

चीननं भारतीय सीमेवर गुपचूप वसवली ६२४ गावं; ड्रॅगनचा पुढचा डाव काय? धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 12:02 IST

भारत आणि चीनमध्ये सीमा वाद सुरू असताना चीनची वेगळीच चाल

बीजिंग: भारतासोबत असलेल्या सीमावादात कुरघोडी करण्यासाठी चीन वेगळीच चाल खेळला आहे. चीननं हिमालयाच्या कुशीत ६२४ गावं वसवली आहेत. वादग्रस्त सीमेच्या आत किंवा बळकावलेल्या भागात चीननं गाव वसवल्याचं बोललं जात आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर २०१७ मध्ये या गावांचं काम सुरू झालं होतं. 

चिनी सरकारनं २०२१ मध्ये गावांचं बांधकाम पूर्ण केल्याची माहिती संरक्षणतज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी चीन सरकारचं संकेतस्थळ असलेल्या तिबेट डॉट सीएनच्या हवाल्यानं दिली आहे. भारतात निवडणुका आणि अंतर्गत राजकारण सुरू असताना चीननं भारताला लागून असलेल्या सीमेवर ६२४ गावं वसवली. तिबेटीमधील गुराख्यांना सीमेवर वसवण्यात यावं असे आदेश चिनी अध्यक्षांनी २०१७ मध्ये दिले होते.

तिबेटमध्ये उभारण्यात आलेल्या गावांमध्ये वीज, इंटरनेट, पाणी आणि पक्के रस्ते बांधण्यात आल्याचा दावा चीननं केला आहे. सोयी सुविधा आल्यानं या भागात समृद्धी, स्थिरता आल्याचं चीननं सांगितलं. या गावांना पॉवर ग्रीडनं जोडण्यात आलं आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे. 

चीननं उभारलेली ६२४ गावं बरीच दूर आहेत. तिथली परिस्थिती राहण्यासाठी फारशी अनुकूल नाही. त्यामुळे चिनी सरकार विविध प्रकारच्या सुविधा देऊन सीमावर्ती भागात स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत आहे. इथे राहण्यास येणाऱ्या लोकांना वर्षाकाठी ३० हजार युआन दिले जात असल्याचं वृत्त तिबेट डेलीनं दिलं आहे. भारतीय चलनात बोलायचं झाल्यास ही रक्कम साडे तीन लाखांच्या घरात जाते.

टॅग्स :chinaचीन