शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मणिपूर हिंसाचारावर माजी लष्करप्रमुख एमएम नरवणेंचे सूचक विधान; म्हणाले, “चीनकडून मदत...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 17:13 IST

MM Naravane On Manipur Violence: सीमावर्ती राज्यांमधील अस्थिरता देशाच्या एकूण राष्ट्रीय सुरक्षेसाठी चांगली नाही, असे एमएम नरवणे यांनी म्हटले आहे.

MM Naravane On Manipur Violence: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेतली असून, सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला जात आहे. विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपूर दौऱ्यावर जाणार आहे. यातच आता माजी लष्करप्रमुख एमएम नरवणे दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिप्रेक्ष्यांवर चर्चेदरम्यान मणिपूर हिंसाचारावर सूचक भाष्य केले आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून बराच गदारोळ झाला. माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) एमएम नरवणे यांनी मणिपूर हिंसाचारावर व्यक्त केलेल्या शंकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. सीमावर्ती राज्यांमधील अस्थिरता देशाच्या एकूण राष्ट्रीय सुरक्षेसाठी चांगली नाही. मणिपूरमधील बंडखोर संघटनांना चीनकडून मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळते. ईशान्य भारतातील बंडखोर संघटनांना याआधीपासून चीनकडून मदत मिळत आहे आणि यापुढेही मिळत राहील. मला खात्री आहे की ज्यांच्याकडे सत्ता आहे ते याची दखल घेतील, असे नरवणे यांनी म्हटले आहे. 

अमली पदार्थांची तस्करी नेहमीच होत असते

ईशान्य भारतात अमली पदार्थांची तस्करी फार पूर्वीपासून होत आहे आणि गेल्या काही वर्षांत जप्त केलेल्या अमली पदार्थांचे प्रमाण वाढले आहे. गोल्डन ट्रँगलपासून (थायलंड, म्यानमार आणि लाओसच्या सीमा जिथे मिळतात ते क्षेत्र) आपण थोड्याच अंतरावर आहोत. म्यानमारमध्ये नेहमीच अशांतता आणि लष्करी राजवट राहिली आहे, असेही नरवणे यांनी सांगितले. 

दरम्यान, विरोधी पक्षांनी नवी रणनीती आखली आहे. INDIA विरोधी आघाडीतील खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरला दौऱ्यावर जाणार आहे. हे शिष्टमंडळ हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या २० हून अधिक खासदारांचे शिष्टमंडळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मणिपूरला भेट देणार आहे. 

टॅग्स :manoj naravaneमनोज नरवणेManipur Violenceमणिपूर हिंसाचार