शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

चीनची आगळीक सुरूच; 30 दिवसांत 35 वेळा घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 08:48 IST

संवेदनशील भागांमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून चीनकडून वारंवार घुसखोरी केली जातं आहे. गेल्या महिन्याभरात चिनी सैन्यानं तब्बल 35 वेळा भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) या घुसखोरीला तीव्र विरोध केल्यामुळे चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली. एका बाजूला पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू असताना दुसऱ्या बाजूला चीननं घुसखोरी सुरू केल्यानं भारताची डोकेदुखी वाढली आहे. एका हिंदी संकेतस्थळानं दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्यात चिनी सैन्यानं लडाखच्या उत्तर भागात सकाळी 7 वाजता घुसखोरी केली. चिनी सैनिक त्यांच्या वाहनातून जवळपास 14 किलोमीटर आत घुसले होते. त्यानंतर त्यांना इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी रोखलं. याशिवाय चिनी सैन्यानं लडाखच्या ट्रिग हाईट भागातदेखील अनेकदा घुसखोरी केली आहे. 18 मार्च, 21 मार्च, 24 मार्च आणि 30 मार्चला चिनी सैन्य भारतीय हद्दीत 8 किलोमीटरपर्यंत आलं होतं. आयटीबीपीच्या अहवालानुसार, लडाखच्या ट्रॅक जंक्शन येथे सकाळी साडे आठ वाजता चिनी हेलिकॉप्टरनं घुसखोरी केली. चिनी हेलिकॉप्टर जवळपास 18 किलोमीटर भारतीय हद्दीत आलं होतं. याचाही आयटीबीपीनं विरोध केला. याबद्दलचा अहवाल आयटीबीपीकडून गृह मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. चिनी सैन्यानं 29 आणि 30 मार्चला अरुणाचल प्रदेशातील असफिला भागात 4 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याची माहिती या अहवालात आहे.22 मार्चला अरुणाचल प्रदेशच्या डिचू भागात सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी चिनी सैनिक 250 मीटरपर्यंत भारतीय हद्दीत आले होते. यावेळी आयटीबीपी आणि चिनी सैन्यात जोरदार खडाजंगी झाली. यानंतर चिनी सैन्य मागे हटलं. भारत-चीन सीमेवरील अतिसंवेदनशील आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये चिनी सैन्याकडून वारंवार घुसखोरी केली जात आहे. भारतीय सैन्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू आहेत.  

टॅग्स :chinaचीनinfiltrationघुसखोरीIndian Armyभारतीय जवान