शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

‘एनआरसी’तून वगळलेल्या मुलांना ‘डिटेन्शन कॅम्प’मध्ये ठेवणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 06:15 IST

आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’मधून (एनआरसी) पालकांचा समावेश होऊनही वगळल्या गेलेल्या फक्त लहान मुलांना सध्या तरी ‘डिटेन्शन कॅम्प’मध्ये ठेवले जाणार नाही,

नवी दिल्ली : आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’मधून (एनआरसी) पालकांचा समावेश होऊनही वगळल्या गेलेल्या फक्त लहान मुलांना सध्या तरी ‘डिटेन्शन कॅम्प’मध्ये ठेवले जाणार नाही, असे आश्वासन अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयास दिले.आसामच्या ‘एनआरसी’ यादीतून १९ लाखांहून अधिक नागरिकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यातही एकाच कुटुंबातील पालकांची नावे यादीत आहेत; पण त्यांच्या मुलांना मात्र यादीतून वगळले गेल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या संदर्भात तेथील एका स्वयंसेवी संस्थेने त्या अनुषंगाने ‘एनआरसी’ यादी दुरुस्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे.सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. भूषण गवई व न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे या अर्जावर अल्प सुनावणी झाली तेव्हा वरीलप्रमाणे आश्वासन देत अ‍ॅटर्नी जनरल म्हणाले की, लहान मुलांची कुटुंबापासून फारकत करून त्यांना ‘डिटेन्शन कॅम्प’मध्ये पाठविले जाण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. ज्यांच्या पालकांची नावे ‘एनआरसी’मध्ये आहेत अशा मुलांना ‘डिटेन्शन कॅम्प’मध्ये पाठविले जाणार नाही. या आश्वासनाची न्यायालयाने नोंद घेतली.> समन्वयकाकडून मागविला खुलासाआसाममध्ये नव्याने नेमण्यात आलेले ‘एनआरसी’ समन्वयक हितेश शर्मा यांनी, त्या पदावर नेमले जाण्यापूर्वी, बंगाली मुस्लिम आणि रोहिंग्यांच्या विरोधात फेसबुकवर अनेक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती याकडे लक्ष वेधणारा आणखी एक अर्ज न्यायालयात करण्यात आला.त्याविषयी विचारता आसाम सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, ‘एनआरसी’चे काम आता संपलेले असल्याने हितेश शर्मा यांना आता त्यात काहीच भूमिका राहिलेली नाही. तरीही खंडपीठाने या संदर्भात शर्मा यांच्याकडून खुलासा मागविला व संदर्भित आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकली जावीत, असे राज्य सरकारला सांगितले.