शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

निराधारांचे आधार ! कधी एकेकाळी एकही मुल नसलेलं दांपत्य आज 51 मुलांचे आई-वडिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 11:11 IST

शेतकरी असणा-या या दांपत्याला मुल होत नसल्याने प्रचंड नैराश्यग्रस्त झाले होते. 1990 मध्ये त्यांनी एका अपंग मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते जवळपास 51 मुलांचे पालक आहेत

ठळक मुद्देमुल होत नसल्याने सतत तक्रार करणा-यांसमोर मुझफ्फरनगरमधील दांपत्याने एक उदाहरण ठेवलं आहेशेतकरी असणा-या या दांपत्याला मुल होत नसल्याने प्रचंड नैराश्यग्रस्त झाले होते1990 मध्ये त्यांनी एका अपंग मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते जवळपास 51 मुलांचे पालक आहेत

मुझफ्परनगर - कधीतरी आयुष्यात अशी एखादी पोकळी असते ज्यामुळे संपुर्ण आयुष्यच पालटून जातं. एकेकाळी पोकळी वाटणारी निर्माण करणारी ही गोष्ट आपल्याला समृद्ध करुन टाकते. असंच काहीसं मुझफ्फरनगरमधील एका दांपत्यासोबत घडलं आहे. शेतकरी असणा-या या दांपत्याला मुल होत नसल्याने प्रचंड नैराश्यग्रस्त झाले होते. 1990 मध्ये त्यांनी एका अपंग मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते जवळपास 51 मुलांचे पालक आहेत. मुल होत नसल्याने सतत तक्रार करणा-यांसमोर या दांपत्याने एक उदाहरण ठेवलं आहे. 

शामली येथील कुदाना गावातील मीना राणा यांचं 1981 मध्ये बाघतपच्या विरेंद्र राणा यांच्याशी लग्न झालं होतं. लग्नाच्या 10 वर्षानंतरही त्यांना मुल होत नव्हतं. मूल व्हावं यासाठी त्यांनी रुग्णालयाच्या फे-या मारल्या, पण काहीच फायदा झाला नाही. तपासणीअंती मीना कधीच आई होऊ शकत नाहीत असं निष्पन्न झालं. 1990 साली दोघेही शुक्रतालमध्ये येऊन राहू लागले. येथे दोघांनी एका मुलाला दत्तक घेतलं. मांगेराम असं त्याचं नामकरण केलं. पण त्यांच्या नशिबाचा खेळ अद्याप संपला नव्हता. पाच वर्षांनी मांगेरामचं निधन झालं आणि नशिबाने पुन्हा एकदा त्यांची परिक्षा घेण्याचं ठरवलं. पण दोघांनीही हार मानायची नाही असा निश्चयच केला होता. दोघांनीही निराधार मुलांना आपल्या घरी आश्रय देण्यास सुरुवात केली. 

शुक्रताल येथे दांपत्याला आठ एकर जमीन देणगीत मिळाली होती. या जमिनीवर त्यांनी अनाथाश्रम सुरु केला असून मुलांचा सांभाळ करतात. येथे त्यांनी एक शाळाही सुरु केली आहे. सध्या येथे 46 मुलं आहेत. दांपत्याच्या मदतीने काहीजण आज मोठ्या कंपनीत रुजू झाले आहेत. काहीजण नोकरीसाठी शहराबाहेर पडली आहेत. अनेकांचं लग्नही त्यांनी लावून दिलं. हे सर्व त्यांनी केलं ते फक्त आणि फक्त देणगींच्या मदतीने. 

आपली मुलं हिंदू आहेत की मुस्लिम याच्याने आपल्याला काहीच फरक पडत नसल्याचं मीना सांगतात. त्या सांगतात, 'ही मुलं माझी आहे फक्त एवढंच मला माहिती आहे'. सध्या त्यांच्याकडे एकूण 46 मुलं असून यामध्ये 19 मुली आणि 27 मुलं आहेत. यामधील अनेकजण अपंग आहेत. अनाथाश्रममध्ये मुलांना खेळण्यासाठी एक मोठं मैदानही तयार करण्यात आलं आहे. राहण्यासाठी उत्तम खोल्या असून, किचनदेखील भलंमोठं आहे. 

शुक्रताल ग्रामपंचायतीने आपल्या जमिनीचा मोठा तुकडा दिला होता. अनेक महत्वाच्या आणि गरजेच्या गोष्टींसाठी आपल्याला देणगीवरच अवलंबून राहावं लागतं. आपले शेजारी आपल्याला धान्य आणि इतर गरजेच्या गोष्टी पुरवतात असं विरेंद्र सांगतात. येथे राहणारी 22 वर्षीय ममता आता जिल्ह्यातील एका कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्यूएट करत आहे. जर मीना आणि विरेंद्र यांनी आपला सांभाळ केला नसता, तर आपण आज कुठे असतो, आपल्या भविष्याचं काय झालं असतं माहित नाही असं ममता सांगते. सतत तक्रार करणा-यांसाठी मीना आणि विरेंद्र एक आदर्शच आहे. 

टॅग्स :Familyपरिवार