शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निराधारांचे आधार ! कधी एकेकाळी एकही मुल नसलेलं दांपत्य आज 51 मुलांचे आई-वडिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 11:11 IST

शेतकरी असणा-या या दांपत्याला मुल होत नसल्याने प्रचंड नैराश्यग्रस्त झाले होते. 1990 मध्ये त्यांनी एका अपंग मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते जवळपास 51 मुलांचे पालक आहेत

ठळक मुद्देमुल होत नसल्याने सतत तक्रार करणा-यांसमोर मुझफ्फरनगरमधील दांपत्याने एक उदाहरण ठेवलं आहेशेतकरी असणा-या या दांपत्याला मुल होत नसल्याने प्रचंड नैराश्यग्रस्त झाले होते1990 मध्ये त्यांनी एका अपंग मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते जवळपास 51 मुलांचे पालक आहेत

मुझफ्परनगर - कधीतरी आयुष्यात अशी एखादी पोकळी असते ज्यामुळे संपुर्ण आयुष्यच पालटून जातं. एकेकाळी पोकळी वाटणारी निर्माण करणारी ही गोष्ट आपल्याला समृद्ध करुन टाकते. असंच काहीसं मुझफ्फरनगरमधील एका दांपत्यासोबत घडलं आहे. शेतकरी असणा-या या दांपत्याला मुल होत नसल्याने प्रचंड नैराश्यग्रस्त झाले होते. 1990 मध्ये त्यांनी एका अपंग मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते जवळपास 51 मुलांचे पालक आहेत. मुल होत नसल्याने सतत तक्रार करणा-यांसमोर या दांपत्याने एक उदाहरण ठेवलं आहे. 

शामली येथील कुदाना गावातील मीना राणा यांचं 1981 मध्ये बाघतपच्या विरेंद्र राणा यांच्याशी लग्न झालं होतं. लग्नाच्या 10 वर्षानंतरही त्यांना मुल होत नव्हतं. मूल व्हावं यासाठी त्यांनी रुग्णालयाच्या फे-या मारल्या, पण काहीच फायदा झाला नाही. तपासणीअंती मीना कधीच आई होऊ शकत नाहीत असं निष्पन्न झालं. 1990 साली दोघेही शुक्रतालमध्ये येऊन राहू लागले. येथे दोघांनी एका मुलाला दत्तक घेतलं. मांगेराम असं त्याचं नामकरण केलं. पण त्यांच्या नशिबाचा खेळ अद्याप संपला नव्हता. पाच वर्षांनी मांगेरामचं निधन झालं आणि नशिबाने पुन्हा एकदा त्यांची परिक्षा घेण्याचं ठरवलं. पण दोघांनीही हार मानायची नाही असा निश्चयच केला होता. दोघांनीही निराधार मुलांना आपल्या घरी आश्रय देण्यास सुरुवात केली. 

शुक्रताल येथे दांपत्याला आठ एकर जमीन देणगीत मिळाली होती. या जमिनीवर त्यांनी अनाथाश्रम सुरु केला असून मुलांचा सांभाळ करतात. येथे त्यांनी एक शाळाही सुरु केली आहे. सध्या येथे 46 मुलं आहेत. दांपत्याच्या मदतीने काहीजण आज मोठ्या कंपनीत रुजू झाले आहेत. काहीजण नोकरीसाठी शहराबाहेर पडली आहेत. अनेकांचं लग्नही त्यांनी लावून दिलं. हे सर्व त्यांनी केलं ते फक्त आणि फक्त देणगींच्या मदतीने. 

आपली मुलं हिंदू आहेत की मुस्लिम याच्याने आपल्याला काहीच फरक पडत नसल्याचं मीना सांगतात. त्या सांगतात, 'ही मुलं माझी आहे फक्त एवढंच मला माहिती आहे'. सध्या त्यांच्याकडे एकूण 46 मुलं असून यामध्ये 19 मुली आणि 27 मुलं आहेत. यामधील अनेकजण अपंग आहेत. अनाथाश्रममध्ये मुलांना खेळण्यासाठी एक मोठं मैदानही तयार करण्यात आलं आहे. राहण्यासाठी उत्तम खोल्या असून, किचनदेखील भलंमोठं आहे. 

शुक्रताल ग्रामपंचायतीने आपल्या जमिनीचा मोठा तुकडा दिला होता. अनेक महत्वाच्या आणि गरजेच्या गोष्टींसाठी आपल्याला देणगीवरच अवलंबून राहावं लागतं. आपले शेजारी आपल्याला धान्य आणि इतर गरजेच्या गोष्टी पुरवतात असं विरेंद्र सांगतात. येथे राहणारी 22 वर्षीय ममता आता जिल्ह्यातील एका कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्यूएट करत आहे. जर मीना आणि विरेंद्र यांनी आपला सांभाळ केला नसता, तर आपण आज कुठे असतो, आपल्या भविष्याचं काय झालं असतं माहित नाही असं ममता सांगते. सतत तक्रार करणा-यांसाठी मीना आणि विरेंद्र एक आदर्शच आहे. 

टॅग्स :Familyपरिवार