शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाहामुळे स्वत: जीवनसाथी निवडण्याच्या हक्कावर येते गदा, सर्वोच्च न्यायालयाचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:42 IST

‘सोसायटी फॉर एनलाइटनमेंट अँड व्हॉलंटरी ॲक्शन’ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला...

नवी दिल्ली : बालविवाहामुळे स्वत: जीवनसाथी निवडण्याच्या हक्कावर गदा येते. हा हक्क वैयक्तिक कायद्याचा वापर करून हिरावून घेता येणार नाही, असे  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या संदर्भातील निकालपत्रात शुक्रवारी म्हटले आहे. ज्या प्रथा, रुढी वैयक्तिक कायद्यांमध्ये अंतर्भूत आहेत, त्यांचा आधार घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्याची (पीसीएमए) अंमलबजावणी रोखता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

‘सोसायटी फॉर एनलाइटनमेंट अँड व्हॉलंटरी ॲक्शन’ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. बालविवाह प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती. बालविवाह प्रतिबंधक कायद्यासंदर्भात न्यायालयाच्या निकालामध्ये केलेल्या समाजशास्त्रीय विश्लेषणाकडे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, लहान वयातच मुलांचा विवाह करणे ही सामाजिक कुप्रथा आहे. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनसाथी निवडण्याच्या अधिकारावर गदा येते. ही मुले प्रौढ होण्याआधीच त्यांच्याकडून जोडीदार निवडण्याचा व आपल्याला हवे तसे जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो. 

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, बालविवाहांमुळे वंचित गटातील मुले विशेषत: मुलींवर मोठा अन्याय होतो. जात, लिंग, सामाजिक-आर्थिक दर्जा अशा अनेक गोष्टी बालविवाह करताना लक्षात घेतल्या जातात. 

‘शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य ही बालविवाहांमागील महत्त्वाची कारणे’सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, दारिद्र्य, लिंग, असमानता, शिक्षणाचा अभाव ही बालविवाहामागील महत्त्वाची कारणे आहेत. असे विवाह रोखण्यासाठी विविध समुदायांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी. समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने प्रयत्न केल्याशिवाय बालविवाह प्रतिबंधक कायद्याची उत्तम अंमलबजावणी होऊ शकणार नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय