शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

बालविवाहामुळे स्वत: जीवनसाथी निवडण्याच्या हक्कावर येते गदा, सर्वोच्च न्यायालयाचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:42 IST

‘सोसायटी फॉर एनलाइटनमेंट अँड व्हॉलंटरी ॲक्शन’ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला...

नवी दिल्ली : बालविवाहामुळे स्वत: जीवनसाथी निवडण्याच्या हक्कावर गदा येते. हा हक्क वैयक्तिक कायद्याचा वापर करून हिरावून घेता येणार नाही, असे  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या संदर्भातील निकालपत्रात शुक्रवारी म्हटले आहे. ज्या प्रथा, रुढी वैयक्तिक कायद्यांमध्ये अंतर्भूत आहेत, त्यांचा आधार घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्याची (पीसीएमए) अंमलबजावणी रोखता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

‘सोसायटी फॉर एनलाइटनमेंट अँड व्हॉलंटरी ॲक्शन’ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. बालविवाह प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती. बालविवाह प्रतिबंधक कायद्यासंदर्भात न्यायालयाच्या निकालामध्ये केलेल्या समाजशास्त्रीय विश्लेषणाकडे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, लहान वयातच मुलांचा विवाह करणे ही सामाजिक कुप्रथा आहे. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनसाथी निवडण्याच्या अधिकारावर गदा येते. ही मुले प्रौढ होण्याआधीच त्यांच्याकडून जोडीदार निवडण्याचा व आपल्याला हवे तसे जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो. 

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, बालविवाहांमुळे वंचित गटातील मुले विशेषत: मुलींवर मोठा अन्याय होतो. जात, लिंग, सामाजिक-आर्थिक दर्जा अशा अनेक गोष्टी बालविवाह करताना लक्षात घेतल्या जातात. 

‘शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य ही बालविवाहांमागील महत्त्वाची कारणे’सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, दारिद्र्य, लिंग, असमानता, शिक्षणाचा अभाव ही बालविवाहामागील महत्त्वाची कारणे आहेत. असे विवाह रोखण्यासाठी विविध समुदायांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी. समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने प्रयत्न केल्याशिवाय बालविवाह प्रतिबंधक कायद्याची उत्तम अंमलबजावणी होऊ शकणार नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय