शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नवीन कार देत नाही म्हणून मुलाने आई-वडिलांवर केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 14:34 IST

आई-वडिलांनी नवीन कार  घेऊन द्यायला नकार दिला म्हणून एका 23 वर्षाच्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आपल्या पालकांवरच हल्ला केला.

ठळक मुद्देआई-वडिल नवीन कार देत नाही म्हणून स्वातंत्र्यदिनी विनयने घरात आकांड-तांडव केले. शो केसची काच डोळयाला लागून विनयची आई जखमी झाली.

बंगळुरु, दि. 21 - आई-वडिलांनी नवीन कार  घेऊन द्यायला नकार दिला म्हणून एका 23 वर्षाच्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आपल्या पालकांवरच हल्ला केला. पश्चिम बंगळुरुच्या राजाजीनगरमध्ये 15 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. वडिल बी.जी. चंद्रहाय यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी बी.सी.विनयला अटक केली आहे. तो खासगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये कॉम्युटर सायन्सच्या शाखेमध्ये शिक्षण घेत आहे. बी.जी. चंद्रहाय हे जमीनदार आणि छोटे कंत्राटदार आहेत. 

आई-वडिल नवीन कार देत नाही म्हणून स्वातंत्र्यदिनी विनयने घरात आकांड-तांडव केले. त्याने घरातील टीव्ही, मोबाईल आणि शो केस फोडला. या दरम्यान शो केसची काच डोळयाला लागून विनयची आई जखमी झाली. वडिलांनी रोखण्याचा प्रयत्न करताना विनयने त्यांनाही मारहाण केली. विनय घरातील मोठा मुलगा असून त्याचा लहान भाऊ मदनने बारावी झाल्यानंतर शिक्षण सोडून दिले. 

मदन वडिल चंद्रहाय यांनी उद्योगामध्ये मदत करत होता. वर्षभरापूर्वी चंद्रहाय यांनी मदनला नवीन जीप विकत घेऊन दिली. तेव्हापासून विनयने आई-वडिलांकडे नवीन कार विकत घेऊन देण्याचा तगादा लावला होता. कारच्या मागणीवरुन विनयचे घरात दररोज आई-वडिलांबरोबर भांडण सुरु होते.  स्वातंत्र्यदिनी दुपारी 2 च्या सुमारास या वादाने टोक गाठले.  विनयने आई-वडिलांकडे नव्या कारची मागणी केली. नेहमीप्रमाणे त्याला नकार मिळताच

विनय संतापला. त्याने घरात आदळ-आपट सुरु केली अशी माहिती सुब्रमण्यम नगर पोलिसांनी दिली. वडिल आणि मुलामधला संघर्ष पोलिसांना अजिबात नवीन नाही. यापूर्वी दोनवेळा चंद्रहाय यांनी मुलाकडून होणा-या त्रासाबद्दल पोलिसांकडे धाव घेतली होती. पण पोलिसांनी इशारा देऊन विनयला सोडले. यावेळी मात्र पोलिसांनी चंद्रहाय यांना तक्रार करायला लावली. आई-वडिलांना मारहाण त्यांना धमकावणे या आरोपांखाली पोलिसांनी विनय विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाच कलमातंर्गत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

विनयने माफी मागितल्यामुळे चंद्रहाय यांना आता मुलाविरोधातील तक्रार मागे घ्यायची आहे. पण विनयला अटक करुन पुढची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे तक्रार मागे घेणे शक्य नाही. आता यापुढे सर्व काही कोर्टाच्या हातात आहे असे तपास अधिका-यांनी सांगितले.