शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

तीन वर्ष वेगळ्या राहिलेल्या दाम्पत्याला मुलाच्या हट्टाने आणलं एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 15:36 IST

मुलाच्या भविष्याचा विचार करून मतभेद विसरून जाण्याचं त्या दाम्पत्याला समजावलं.

गाझियाबाद- तीन वर्षापासून वेगळं राहत असलेलं दाम्पत्य त्यांच्या मुलाच्या हट्टामुळे एकत्र आले आहेत. कोर्टामध्ये आईबरोबर आलेल्या मुलाने वडिलांकडे जाण्याचा हट्ट केल्याने या दाम्पत्याला त्यांच्यातील कटुता मिटवून एकत्र यावं लागलं. कोर्ट परिसरात हे सगळं घडत असताना परिसरातील लोकांनी मुलाच्या भविष्याचा विचार करून मतभेद विसरून जाण्याचं त्या दाम्पत्याला समजावलं. त्यानंतर पतीने पत्नीची माफी मागत पुन्हा चुका न करण्याचं आश्वासन दिलं. पतीने माफी मागितल्यावर पत्नीने बराच वेळ विचार करून शेवटी हो म्हणत भांडण मिटवलं. या सगळ्यानंतर पत्नीने कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत केस मागे घेतली. 

साहिबाबाद भागात राहणाऱ्या एका तरूणाचं सहा वर्षापूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर एक वर्षाने त्यांना मुलगा झाला. त्यानंतर दोन वर्षाने त्या दोघांमध्ये वाद झाले. वादानंतर महिला मुलाला घेऊन वेगळं राहू लागली. महिलेने उदरनिर्वाह निधीसाठी पतीविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. तर दुसरीकडे, पतीने मुलाच्या हक्कासाठी कोर्टात केस दाखल केली. तेव्हापासून या प्रकरणात कोर्टात सुनावणी बाकी होती. पण गुरूवारी (ता. 7 जून) या प्रकरणाचा निकाल त्या दाम्पत्याच्या मुलानेच लावला.