शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बासमती तांदळावरून दोन राज्यांचे मुख्यमंत्री आमनेसामने, प्रकरण पंतप्रधानांच्या दरबारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 15:39 IST

बासमती तांदळाचे आपले असे खास वैशिष्ट्य आहे. भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असून, त्यामध्ये बासमती तांदळाची भागिदारी मोठी आहे.

नवी दिल्ली - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सुवासासाठी प्रसिद्ध असलेल्या बासमती तांदळावरून सध्या देशातील दोन राज्यांचे मुख्यमंत्री आमनेसामने आले आहेत. बासमती तांदळाच्या जीआय टँगच्या मुद्द्यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात वाद रंगला आहे. दरम्यान, दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमधील वाद आता पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. 

कडकनाथ कोंबड्यानंतर आता मध्य प्रदेशने बासमती तांदळाच्या जीआय मानांकनावर आपली दावेदारी ठोकली आहे. त्यानंतर या दावेदारीला प्रत्युत्तर म्हणून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. बासमती तांदळाचे उत्पादन करणाऱ्या विशेष क्षेत्रात मध्य प्रदेशचा समावेश होत नाही. त्यामुळे मध्य प्रदेशला जीआय मानांकन दिल्यास जीआय मानांकनाच्या मूळ उद्देशास हरताळ फासला जाईल, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. 

बासमती तांदळाचे आपले असे खास वैशिष्ट्य आहे. भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असून, त्यामध्ये बासमती तांदळाची भागिदारी मोठी आहे. गतवर्षी भारताने ७० लाख टन तांदळांची निर्यात केली होती. बासमती तांदळाच्या उत्पादनात  भारतातील उत्तरेकडील पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर या राज्यांची भागीदारी मोठी आहे. मध्य प्रदेशातील १३ जिल्ह्यांत बासमती तांदळाचे उत्पादन होते. गतवर्षी मध्य प्रदेशात तीन लाख टन बासमती तांदळाचे उत्पादन झाले होते. मात्र मध्य प्रदेशकडे बासमतीसाठीचा जीआय टँग नाही. त्यामुळे सीहोरच्या शरबती गव्हाप्रमाणे येथील बासमतीचा बाजारात दबदबा दिसून येत नाही.

टॅग्स :IndiaभारतagricultureशेतीMadhya Pradeshमध्य प्रदेशPunjabपंजाब