शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

बासमती तांदळावरून दोन राज्यांचे मुख्यमंत्री आमनेसामने, प्रकरण पंतप्रधानांच्या दरबारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 15:39 IST

बासमती तांदळाचे आपले असे खास वैशिष्ट्य आहे. भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असून, त्यामध्ये बासमती तांदळाची भागिदारी मोठी आहे.

नवी दिल्ली - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सुवासासाठी प्रसिद्ध असलेल्या बासमती तांदळावरून सध्या देशातील दोन राज्यांचे मुख्यमंत्री आमनेसामने आले आहेत. बासमती तांदळाच्या जीआय टँगच्या मुद्द्यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात वाद रंगला आहे. दरम्यान, दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमधील वाद आता पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. 

कडकनाथ कोंबड्यानंतर आता मध्य प्रदेशने बासमती तांदळाच्या जीआय मानांकनावर आपली दावेदारी ठोकली आहे. त्यानंतर या दावेदारीला प्रत्युत्तर म्हणून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. बासमती तांदळाचे उत्पादन करणाऱ्या विशेष क्षेत्रात मध्य प्रदेशचा समावेश होत नाही. त्यामुळे मध्य प्रदेशला जीआय मानांकन दिल्यास जीआय मानांकनाच्या मूळ उद्देशास हरताळ फासला जाईल, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. 

बासमती तांदळाचे आपले असे खास वैशिष्ट्य आहे. भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असून, त्यामध्ये बासमती तांदळाची भागिदारी मोठी आहे. गतवर्षी भारताने ७० लाख टन तांदळांची निर्यात केली होती. बासमती तांदळाच्या उत्पादनात  भारतातील उत्तरेकडील पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर या राज्यांची भागीदारी मोठी आहे. मध्य प्रदेशातील १३ जिल्ह्यांत बासमती तांदळाचे उत्पादन होते. गतवर्षी मध्य प्रदेशात तीन लाख टन बासमती तांदळाचे उत्पादन झाले होते. मात्र मध्य प्रदेशकडे बासमतीसाठीचा जीआय टँग नाही. त्यामुळे सीहोरच्या शरबती गव्हाप्रमाणे येथील बासमतीचा बाजारात दबदबा दिसून येत नाही.

टॅग्स :IndiaभारतagricultureशेतीMadhya Pradeshमध्य प्रदेशPunjabपंजाब