शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

उत्तराखंडचे CM धामींचा सोमवारी मुंबईत रोड शो; उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी सरकारचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 17:01 IST

उत्तराखंडमध्ये उद्योगांना चालना मिळावी म्हणून राज्य सरकार सातत्याने पाऊले उचलत आहे.उत्तराखंडमध्ये उद्योगांना चालना मिळावी म्हणून राज्य सरकार सातत्याने पाऊले उचलत आहे.

उत्तराखंडमध्ये उद्योगांना चालना मिळावी म्हणून राज्य सरकार सातत्याने पाऊले उचलत आहे. अलीकडेच ८ आणि ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट'साठी अहमदाबाद येथे रोड शो पार पडला. आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सोमवारी मुंबईत रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. यादरम्यान ते उत्तराखंडमधील गुंतवणूकीसंदर्भात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील विविध उद्योग समूहांसोबत बैठक घेतील. तसेच राज्य सरकारने ४ आंतरराष्ट्रीय रोड शोसह एकूण ८ रोड शोचे आयोजन केले असून यामध्ये सुमारे ९४ हजार कोटींहून अधिक गुंतवणूकीचे करार करण्यात आले आहेत. राज्य सरकार येत्या डिसेंबर महिन्यापूर्वी राज्यात जास्तीत जास्त सामंजस्य करार राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

दरम्यान, उत्तराखंड सरकारने आतापर्यंत विविक्ष क्षेत्रातील गुंतवणूकारांसोबत करार केले आहेत. पुष्कर सिंह धामींच्या नेतृत्वातील सरकारने ज्या गुंतवणूकदारांसोबत गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले आहेत, त्यात प्रामुख्याने पर्यटन हॉस्पिटॅलिटी क्षेत्र, आयुष वेलनेस क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, फार्मा क्षेत्र, अन्न प्रक्रिया, रिअल इस्टेट-इन्फ्रा, पंप स्टोरेज क्षेत्र, हरित आणि अक्षय ऊर्जा आणि ऑटोमोबाईल यांचा समावेश आहे.  

उद्योगजगताला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री धामी विविध भागांमध्ये रोड शो करत आहेत. धामी यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत देशाबाहेर लंडन, बर्मिंगहॅम, अबुधाबी, दुबई येथे चार आंतरराष्ट्रीय रोड शो झाले आहेत. याशिवाय राज्य सरकारने दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद येथे देशभर रोड शो केले आहेत. १४ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर रोजी धामी सरकारने दिल्लीत २६५७५ कोटी, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी ब्रिटनमध्ये १२५०० कोटी, १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी UAE मध्ये १५४७५ कोटी गुंतवणूकीचा करार केला. तसेच २६ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये १०१५० कोटी, बंगळुरूमध्ये २८ ऑक्टोबरला ४६०० कोटी आणि अहमदाबादमध्ये १ नोव्हेंबर रोजी २४००० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. 

हरित अर्थव्यवस्थेवर सरकारचा भर राज्यातील हरित अर्थव्यवस्थेवर धामी यांचे विशेष लक्ष असून त्यादृष्टीने राज्य सरकार काम करत आहे. धामी सरकार पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेबरोबरच राज्यात गुंतवणूकीच्या दिशेने वाटचाल करत आहे. पर्यावरणाचा समतोल लक्षात घेऊन अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले. याला राज्य सरकारने 'ग्रीन इकॉनॉमी' असे संबोधले. उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या कंपन्यांसोबत ३०० कोटींहून अधिक किमतीचे सामंजस्य करार झाले आहेत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडMumbaiमुंबई