शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"केरळमध्ये CAA लागू होणार नाही"; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले स्पष्ट

By देवेश फडके | Updated: February 14, 2021 10:23 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) वरून आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सीएए लागू करण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतरच लगेच दुसऱ्या दिवशी पिनराई विजयन यांनी केरळमध्ये सीएए लागू होणार नसल्याचे सांगितले.

ठळक मुद्देकेरळमध्ये सीएए लागू करणार नाही - मुख्यमंत्रीकोरोना लसीकरणानंतर सीएए लागू करणार - अमित शाह CAA ला केरळचा पाठिंबा नाही - पिनराई विजयन

कासारगोड : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) वरून आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशव्यापी कोरोना लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाली की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होईल, असे सांगितले होते. यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केरळमध्ये हा कायदा लागू करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. (chief minister pinarayi vijayan cleared that we will not implement caa in kerala)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सीएए लागू करण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतरच लगेच दुसऱ्या दिवशी पिनराई विजयन यांनी केरळमध्ये सीएए लागू होणार नसल्याचे सांगितले. केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कासारगोड येथे काढण्यात आलेल्या एका रॅलीत मुख्यमंत्री विजयन सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

"मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी अन् आत्महत्या हे तीन पर्याय दिलेत", राहुल गांधींचं टीकास्त्र

काही जणांनी सीएए संदर्भात पुन्हा चर्चा सुरू केली आहे. आमचे मत स्पष्ट आहे. केरळमध्ये सीएए लागू होणार नाही. राज्य सरकार केरळमध्ये सीएए लागू करण्याच्या बाजूने नाही. केंद्राच्या 'सीएए'चे समर्थन केरळ करत नाही. 'सीएए'बाबत केरळ सरकारचा केंद्राला पाठिंबा यापूर्वीही नव्हता आणि यानंतरही केरळमध्ये सीएए लागू केले जाणार नाही, असे विजयन यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, कोरोना लसीकरणाची प्रक्रिया संपल्यानंतर पश्चिम बंगालच्या मतुआ समुदायासह सीएए अंतर्गत शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू होईल. सीएएच्या अंमलबजावणीचा भारतीय अल्पसंख्याकांच्या नागरिकत्वावर परिणाम होणार नाही. आम्ही सीएए लागू करणार होतो. मात्र, त्याचवेळी कोरोनाचे संकट उभे राहिले. आता लसीकरण करण्याचे काम संपून, कोरोनातून मुक्त होताच भाजप सरकार आपणा सर्वांना नागरिकत्व देण्याचे काम करेल, असे अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये बोलताना सांगितले होते. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliticsराजकारणAmit Shahअमित शहाKeralaकेरळ