शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

"केरळमध्ये CAA लागू होणार नाही"; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले स्पष्ट

By देवेश फडके | Updated: February 14, 2021 10:23 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) वरून आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सीएए लागू करण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतरच लगेच दुसऱ्या दिवशी पिनराई विजयन यांनी केरळमध्ये सीएए लागू होणार नसल्याचे सांगितले.

ठळक मुद्देकेरळमध्ये सीएए लागू करणार नाही - मुख्यमंत्रीकोरोना लसीकरणानंतर सीएए लागू करणार - अमित शाह CAA ला केरळचा पाठिंबा नाही - पिनराई विजयन

कासारगोड : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) वरून आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशव्यापी कोरोना लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाली की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होईल, असे सांगितले होते. यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केरळमध्ये हा कायदा लागू करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. (chief minister pinarayi vijayan cleared that we will not implement caa in kerala)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सीएए लागू करण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतरच लगेच दुसऱ्या दिवशी पिनराई विजयन यांनी केरळमध्ये सीएए लागू होणार नसल्याचे सांगितले. केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कासारगोड येथे काढण्यात आलेल्या एका रॅलीत मुख्यमंत्री विजयन सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

"मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी अन् आत्महत्या हे तीन पर्याय दिलेत", राहुल गांधींचं टीकास्त्र

काही जणांनी सीएए संदर्भात पुन्हा चर्चा सुरू केली आहे. आमचे मत स्पष्ट आहे. केरळमध्ये सीएए लागू होणार नाही. राज्य सरकार केरळमध्ये सीएए लागू करण्याच्या बाजूने नाही. केंद्राच्या 'सीएए'चे समर्थन केरळ करत नाही. 'सीएए'बाबत केरळ सरकारचा केंद्राला पाठिंबा यापूर्वीही नव्हता आणि यानंतरही केरळमध्ये सीएए लागू केले जाणार नाही, असे विजयन यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, कोरोना लसीकरणाची प्रक्रिया संपल्यानंतर पश्चिम बंगालच्या मतुआ समुदायासह सीएए अंतर्गत शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू होईल. सीएएच्या अंमलबजावणीचा भारतीय अल्पसंख्याकांच्या नागरिकत्वावर परिणाम होणार नाही. आम्ही सीएए लागू करणार होतो. मात्र, त्याचवेळी कोरोनाचे संकट उभे राहिले. आता लसीकरण करण्याचे काम संपून, कोरोनातून मुक्त होताच भाजप सरकार आपणा सर्वांना नागरिकत्व देण्याचे काम करेल, असे अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये बोलताना सांगितले होते. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliticsराजकारणAmit Shahअमित शहाKeralaकेरळ