शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

केजरीवालांच्या समर्थनार्थ चार राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 22:44 IST

पिनराई विजयन, ममता बॅनर्जी, एच. डी. कुमारस्वामी व चंद्रबाबू नायडू अचानक भेटल्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये तर्कवितर्क सुरू झाले.

नवी दिल्ली : केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक व तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी अचानक दिल्लीच्या आंध्र प्रदेश भवनामध्ये बैठक झाली. ते निती आयोगाच्या बैठकीसाठी आले होते. मात्र पिनराई विजयन, ममता बॅनर्जी, एच. डी. कुमारस्वामी व चंद्रबाबू नायडू अचानक भेटल्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये तर्कवितर्क सुरू झाले.

आज संध्याकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी पोहोचले आणि त्यांनाही बैजल यांनी भेटण्यासाठी परवानगी दिली नाही. यावर केजरीवाल यांनी टि्वट करून, हे सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून होत आहे.  नायब राज्यपाल हे स्वत: चा निर्णय घेत नाही आहेत. ते पंतप्रधानांच्या आदेशावर चालतात, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

 

नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही. अशी परिस्थिती कोणवरही येऊ शकते. गेल्या चार महिन्यापासून दिल्लीतील काम बंद आहे. केंद्र सरकार सुडबुद्धीने वागत आहे. राजधानी दिल्ली सारख्या छोट्या राज्याचे म्हणणे ऐकले जात नसेल तर मोठ्या राज्यांचे काय होणार? असा सवाल कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. तर, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले की, आम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष द्यावे आणि समस्या सोडवावी, अशी मागणी त्यांच्याकडे करणार आहोत. तसेच, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिल्लीतल्या समस्येला केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. 

 

या चारही मुख्यमंत्र्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राजभवनात त्यांची भेट घेण्याचे ठरविले होते. त्यांनी त्यासाठी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना तसे पत्रही लिहिले. मात्र त्यांना केजरीवाल यांची भेट घेण्यास राज्यपालांनी नकार दिला.

 

 

 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालMamata Banerjeeममता बॅनर्जीkumarswamyकुमारस्वामीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू