शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सरन्यायाधीशही ‘आरटीआय’च्या कक्षेत? स्वत:च्याच अपिलाची कोर्ट करणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 05:43 IST

सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ याच न्यायालयाने नऊ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या एका अपिलावर येत्या २७ मार्चपासून अंतिम सुनावणी सुरु करणार आहे.

नवी दिल्ली  - सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ याच न्यायालयाने नऊ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या एका अपिलावर येत्या २७ मार्चपासून अंतिम सुनावणी सुरु करणार आहे. सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत येतात का, हा या आपिलात कळीचा मुद्दा आहे.ज्येष्ठ ‘आरटीआय’ कार्यकर्ते सुभाष अगरवाल यांनी केलेल्या अर्जामुळे सुमारे १५ वर्षांपूर्वी या वादाला सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी त्यांच्या व्यक्तिगत मालमत्तांसंबंधीचा जो तपशील सरन्यायाधीशांकडे दिला तो अगरवाल यांनी माहिती अधिकारीत मागितला होता. न्यायालयाच्या माहिती अधिकाऱ्याने ती माहिती देण्यास नकार दिला तेव्हा अगरवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. एकल न्यायाधीशाने व नंतर अपिलात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने अगरवाल यांच्याबाजूने निकाल दिले व त्यांनी मागितलेली माहिती सर्वोच्च न्यायालयास द्यावी लागेल, असा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालय व सरन्यायाधीश हे ‘आरटीआय’ कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकारी आहेत व त्यांना माहिती अधिकार कायदा लागू आहे, असा या निकालांचा निष्कर्ष होता.याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने स्वत:च्याच न्यायालयात केलेले अपील आता २७ मार्चपासून घटनापीठापुढे सुनावणीसाठी येणार आहे. हे अपील सन २०१० मधील आहे. त्यानंतर सहा वर्षांनी सन २०१६ मध्ये न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा विषय घटनापीठाकडे सोपविण्याची शिफारस केली होती. त्यानुसार न्या. गोगोई आता स्वत: सरन्यायाधीश झाल्यावर त्यांनी त्यासाठी घटनापीठ नेमले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयIndiaभारत