शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

प्रत्येक प्रश्न सर्वोच्च न्यायालयानेच सोडवायचा, तर मग लोकसभा-राज्यसभेची काय गरज? - सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 22:02 IST

अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे भाष्य केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी गुरुवारी राजकीय विषय न्यायालयासमोर आणल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सरन्यायाधीश म्हणाले, जर मी मान्य केले, की आपल्या सर्व मुद्यांवर आम्ही सुनावणी करू आणि आदेश जारी करू, तर मग लोकसभा आणि राज्यसभेसाठी राजकीय प्रतिनिधीं कशासाठी निवडून आणले जातात? एवढेच नाही, तर आता काय आम्हाला विधेयकही मंजूर करावे लागेल का? असेही  सरन्यायाधीशांनी विचारले आहे.

कोर्टासमोर आला रोहिंग्यांचा मुद्दा - अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे भाष्य केले आहे. अश्विनी उपाध्याय यांनी न्यायालयात याचिका दाखल करत, एका महिन्याच्या आता देशभरातील रोहिंग्या मुसलमानांची ओळख पटवून त्यांना पकडण्याचे आणि परत पाठवण्याचे आदेश सरकारला देण्यात यावेत, अशी विनंती केली होती.

प्रत्येक प्रश्नाचं निराकरण आम्हीच करायचं?मेंशनिंग अवर दरम्यान अश्विनी उपाध्याय यांनी सरन्यायाधिशांसमोर रोहिंग्यांचा मुद्दा ठेवत लगेच सुनावणी करण्याची मागणी केली. अश्विनी उपाध्याय म्हणाले, पाच कोटी रोहिंग्या रिफ्यूजी आमचा जगण्याचा अधिकार आमच्याकडून हिरावत आहेत. यावर सीजेआय म्हणाले, मिस्टर उपाध्याय, आम्ही रोज काय पलीच केस ऐकण्यासाठी बसलो आहोत का? सूर्याखाली जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या सर्व, संसदेच्या समस्या, नॉमिनेशनच्या समस्या, इलेक्शन रिफॉर्मस, सर्व काही आम्हीच ऐकायचं का? हे सर्व राजकीय मुद्दे आहेत. हे सरकार समक्ष ठेवाण्याऐवजी न्यायालयासमोर ठेवले आहेत. सरन्यायाधीश म्हणाले, गंभीर राजकीय विषय न्यायालयापुढे आणून न्यायालयावर ओझे टाकले जात आहे. खरे तर, हे मुद्दे सरकारनेच सोडवायला हवेत.

यावर अश्विनी उपाध्याय म्हणाले, यावर काही राज्यांनीही उत्तर दिले आहे. यावर सीजेआय यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विचारणा केली, की जर आपल्याकडे काउंटर अॅफिडेव्हिट असेल तर, आम्ही ही केस लिस्ट करू शकतो. यावर आपल्याला या केससंदर्भात काहीही माहीत नाही, असे सॉलिसिटर जनरल म्हणाले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाRohingyaरोहिंग्याN V Ramanaएन. व्ही. रमणा