शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

हृदयद्रावक! ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; खांद्यावर मृतदेह ठेवून बाप १० किमी चालला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 13:11 IST

नर्सनं दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा करण्यात आला आरोप. आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश.

Chhattisgarh News:  छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथील शासकीय रुग्णालयात ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर वडील रुग्णवाहिकेसाठी विनवणी करत राहिले, मात्र त्यांना रुग्णवाहिका मिळालीच नाही. जेव्हा त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही तेव्हा वडिलांनी आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर ठेवला आणि १० किमी चालत आपल्या घरी पोहोचले. आपल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयातील नर्सवर मोठा आरोप करण्यात आला आहे. चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. हे प्रकरण समोर आल्यानंतर निर्माण झालेला वाद पाहता आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्या सूचनेनुसार बीएमओ हटवण्यात आले. तसंच आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले आहे. याबाबत आरोग्यमंत्र्यांनीही ट्वीट केलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लखनपूर ब्लॉक येथील आहे. ईश्वर दास हे येथील अमदला गावचे रहिवासी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या मुलीची प्रकृती बिघडली होती. तिचा तापही उतरत नव्हता. हे पाहून कुटुंबीयांनी मुलीला घेऊन शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लखनपूर आरोग्य केंद्र गाठलं. परंतु या ठिकाणी उपचार सुरू असताना मुलीचा मृत्यू झाला. मुलीचा मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, बराच वेळ प्रतीक्षा करूनही त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही.

वडिलांनी सांगितली आपबितीजेव्हा रुग्णवाहिकेबाबत कोणतीही व्यवस्था होऊ शकली नाही तेव्हा वडील ईश्वर दास यांनी मुलीचा मृतदेह खांद्यावर उचलला आणि घराकडे निघाले. सुमारे दहा किलोमीटर चालत त्यांनी आपलं घर गाठवं. माध्यमांनी ईश्वर दास यांना विचारले असता त्यांनी संपूर्ण परिस्थिती सांगितली. मुलीचा मृतदेह नेण्यासाठी जेव्हा रुग्णवाहिकेची विचारणा केली तेव्हा रुग्णालय व्यवस्थापनानं टाळाटाळ केल्याचे ते म्हणाले. नर्सने आपल्या मुलीला चुकीचे इंजेक्शन दिले. यानंतर तिच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि तिचा मृत्यू झाला, असा आरोपही त्यांनी केला.

आरोग्यमंत्र्यांकडून दखलया प्रकरणाची आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव यांनी दखल घेत ट्वीटही केलं. यात दिसणारी दृश्ये दुर्दैवी आहेत आणि संभाव्य उपचारानंतर या मुलीचा मृत्यू होणे अत्यंत दुःखद आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल आणि जे आपल्या कर्तव्यांचं पालन करण्यात सक्षम नाहीत, त्यांची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे सोपवली जाईल असंही ते म्हणाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलIndiaभारत