शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

“बागेश्वर धाम माहित नाही, विचारेन- चमत्कार कसा करता?” धीरेंद्र शास्त्रींवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 11:48 IST

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात धीरेंद्र शास्त्री यांची चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात धीरेंद्र शास्त्री यांची चर्चा रंगली आहे. हेच महाराज बागेश्वर धामचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना बागेश्वर महाराज म्हणून देखील ओळखले जाते. खरंतर, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात याच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो वेळेत पारही पडला. पण, त्याच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आक्षेप घेतला गेला. दरम्यान, जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी पुन्हा एकदा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबाबत मोठं वक्यव्य केलं आहे.

“आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, जे चमत्कार दाखवतात आणि जनतेला ठगतात. आम्ही त्या सर्व लोकांना सांगितलंय जे चमत्कार करतात, त्यांनी पुढे यावं आणि जोशीमठातील भूस्खलन थांबवून दाखवावं,” असं अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. त्यांनी धर्म, चमत्कार आणि राजकारणाच्या मुद्द्यावर आजकशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. “मला बागेश्वर धाम माहित नाही. काही लोकांनी त्या ठिकाणी चमत्कार होत असल्याचं सांगितलं. जर असं असेल तर त्यांनी पुढे यावं आणि जोशीमठातील भूस्खलन थांबवावं,” असंही त्यांनी नमूद केलं. आमच्या लोकांनी ते आम्हाला भेटण्यास येणार असल्याचं सांगितलं. जर ते आमच्याकडे आले आणि चमत्काराची गोष्ट स्वीकारली तर आम्ही त्यांना कोणती साधना केली हे विचारू. कोणत्या शास्त्र आणि परंपरेनुसार त्यांनी साधना केली, कोणत्या सिद्धी मिळल्या, ज्या आधारावर ते चमत्काराची गोष्ट करत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

जोशीमठ समस्येवरून लक्ष वळवलं“जोशीमठाचं प्रकरण अतिशय मोठं झालं आहे. सर्वांचं लक्ष त्याच ठिकाणी होतं. अशात लक्ष वळवण्यासाठी हे केलं गेलंय. जेव्हा आपल्याकडे कोणती मोठी समस्या येते तेव्हा लक्ष वळवण्यासाठी अशा छोट्या-छोट्या गोष्टी मोठ्या असल्याचं सांगून दाखवल्या जातात. आता सर्व लोक जोशीमठाची ससम्या विसरले आहे, पण ती मोठी समस्या आहे. सर्वांचं लक्ष आता याकडे वळलंय. यानं देशाला कोणता लाभ होतोय?” असा सवालही शकराचार्य यांनी केला. 

प्रत्येक ठिकाणी राजकारणया चमत्कारातही राजकारण आहे का? असा सवाल शंकराचार्य यांना करण्यात आला. “आता राजकारण कुठे नाही, प्रत्येक ठिकाणी राजकारण होतंय,” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम