शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 17:21 IST

एक विवाहित महिला आपल्याच दिरासोबत पळून गेली कारण तिला सुंदर मूल हवं आहे.

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक विवाहित महिला आपल्याच दिरासोबत पळून गेली कारण तिला सुंदर मूल हवं आहे. महिलेचा दीर खूप देखणा आहे, त्यामुळे तिला त्याच्यासोबत राहायचं आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी पळून गेली आहे. पण ती त्याला आता विष प्राशन करून अडकवण्याची धमकी देत ​​आहे. त्यामुळे त्याने पत्नीपासून आपल्याला वाचवण्याची विनंती केली आहे. 

महिला आपल्या पतीला सोडून दिरासोबत घरातून पळून गेली आहे. लग्नाला दहा वर्षे झाल्यावरही तिला मूल झालं नाही. ती म्हणते की, तिला एक सुंदर मूल हवं आहे पण तिचा नवरा देखणा नाही. नवऱ्यापेक्षा दीर जास्त देखणा आहे. त्यामुळे तिला तिच्या दिराकडून आता मूल हवं आहे. ती दिरावर प्रेम करू लागली. हा सर्व प्रकार पाहून सासूने सुनेला हे करण्यापासून रोखलं, तेव्हा दोघेही घरातून पळून गेले. या घटनेनंतर आता संपूर्ण कुटुंब न्याय मागण्यासाठी एसपी कार्यालयात पोहोचलं आहे.

सीताराम कॉलनीत राहणारा २८ वर्षीय राजेंद्र कुशवाह कुटुंबासह एसपी कार्यालयात पोहोचला आणि सांगितलं की, दहा वर्षांपूर्वी मीना कुशवाहसोबत लग्न झालं होतं, जी आता त्याच्या लहान भावासह पळून गेली आहे. आता ती मेसेजच्या माध्यमातून आम्हाला आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. स्वत:चा बचाव करण्यासाठी एसपी कार्यालय गाठलं आहे. एक तर तिने चुकीचं केलं आणि दिरासोबत पळून गेली आणि आता ती आम्हाला धमकी देऊन त्रास देत आहे. 

पती म्हणाला की, मला खूप काळजी वाटायची. सर्व काही सुरळीत करण्यासाठी, मी सर्वकाही केलं. पण काहीही फायदा झाला नाही. पत्नीने सांगितलं की, मला तुझ्यापासून सुटका हवी आहे. मला माझं प्रेम म्हणजे तुमचा धाकटा भाऊ आणि माझा दीर याच्याकडून मूल हवं आहे. तो तुझ्यापेक्षा सुंदर दिसतो. त्याच्यापासून मला सुंदर मूल होईल. या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रम सिंह यांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची गंभीर चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश