शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

स्वयंघोषित 'कल्की भगवान' यांच्या आश्रमांवर छापा, सापडली कोट्यवधींची माया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 17:23 IST

प्राप्तिकर विभागाने भगवान कल्कींचे अवतार सांगणाऱ्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुच्या आश्रमावर छापा टाकला आहे.

ठळक मुद्देप्राप्तिकर विभागाने भगवान कल्कींचे अवतार सांगणाऱ्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुच्या आश्रमावर छापा टाकला आहे.तब्बल 600 कोटींची बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: ला कल्की भगवान म्हणवणाऱ्या विजय कुमार नायडू यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांवर छापा टाकण्यात आला

चेन्नई - प्राप्तिकर विभागाने भगवान कल्कींचे अवतार सांगणाऱ्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुच्या आश्रमावर छापा टाकला आहे. यामध्ये तब्बल 600 कोटींची बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: ला कल्की भगवान म्हणवणाऱ्या विजय कुमार नायडू यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांवर छापा टाकण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कल्की भगवान आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांच्या आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये असलेल्या विविध आश्रमांवर छापा टाकण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत 40 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. 

कल्की यांनी यावर देश सोडून कुठेही गेलेलो नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच 'मी देश सोडून गेलेलो नाही किंवा मी अन्य कुठेही गेलो नाही. मी इथेच आहे आणि माझी प्रकृती ठीक आहे असं मी माझ्या भक्तांना सांगू इच्छितो. सरकार किंवा प्राप्तिकर विभागाने मी देश सोडून गेल्याचं सांगितलेलं नाही. मात्र, मी देश सोडून गेलो आहे असं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे' असं कल्की यांनी सांगितलं आहे. कल्की यांच्या आश्रमांवर जमिनी हडपण्याचा आणि कर चुकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

कल्की यांच्या नावावर एक विद्यापीठ आणि आध्यात्मिक शाळा देखील आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील वैरादेहपलेममध्ये त्यांचा मुख्य आश्रम आहे. बंगळुरू येथील आश्रमावर छापा टाकण्यात आल्यावर तब्बल 93 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली होती. तसेच इतर ठिकाणी मारण्यात आलेल्या छाप्यामध्ये 409 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता तब्बल 600 कोटींची बेहिशोबी मालमत्ता असल्याचं उघड झालं आहे. भारतासोबतच कल्की यांच्या संस्थांनी चीन, अमेरिका, सिंगपूरमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याजवळ बेहिशेबी मालमत्ता देखील मोठ्या प्रमाणात आहे. 

कल्की यांच्या आश्रमांवर जमिनी हडपण्याचा आणि कर चुकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 40 हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये जवळपास 18 कोटी रुपयांचे परदेशी चलन, 88 किलो सोने-चांदीचे दागिने सापडले आहेत. दागिन्यांची किंमत ही जवळपास 26 कोटी आहे. याआधी 1271 कॅरेटचे म्हणजेच पाच कोटींचे हिरे देखील प्राप्तिकर विभागाला सापडले होते. एका हिंदी वेबसाईटने याचे वृत्त दिले आहे. कल्की यांनी एलआयसीचा क्लार्क म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर 1989 मध्ये चित्तूर विजय कुमार यांनी आपण भगवान विष्णूचा दहावा अवतार असल्याचा दावा केला आहे. यानंतर त्यांच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. त्यांच्या दर्शनासाठी भक्तांना 5 हजारापासून 25 हजारे रुपये खर्च करावे लागतात. तसेच त्यांच्या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या पावत्यांमध्ये हेराफेरी केली जात असून ते पैसे रिअल इस्टेटमध्ये वापरले जात होते. प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाडTamilnaduतामिळनाडू