शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

धनादेश न वटल्याचे खटले; महाराष्ट्रासह ५ राज्यांत न्यायालये, सुप्रीम कोर्टाने दिला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 06:28 IST

धनादेश न वटल्याच्या प्रकरणांचे सुमारे ३३.४४ लाख खटले प्रलंबित आहेत. त्यातील सर्वांत जास्त ५.६ लाख खटले महाराष्ट्रात तुंबले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : धनादेश न वटण्याची देशात दरवर्षी हजारो प्रकरणे घडत असतात. अशा प्रकरणांचे खटले चालविण्यासाठी महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये विशेष न्यायालये स्थापन करण्यात यावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या राज्यांमध्ये दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान यांचाही समावेश आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एल. नागेश्वर राव, न्या. भूूषण गवई, न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या (एनआय) अन्वये ही विशेष न्यायालये स्थापन करण्यात यावीत. न्यायालयाने उल्लेख केलेल्या महाराष्ट्रासहित पाच राज्यांमध्ये धनादेश न वटण्याच्या प्रकरणांची संख्या खूप मोठी आहे. या विशेष न्यायालयांची स्थापना प्रथम प्रायोगिक तत्त्वावर करावी, अशी सूचना आम्ही केली आहे. तसेेच त्यासाठी कालमर्यादाही आखून दिली आहे.

प्रलंबित खटल्यांत महाराष्ट्र अव्वल

- धनादेश न वटल्याच्या प्रकरणांचे सुमारे ३३.४४ लाख खटले प्रलंबित आहेत. त्यातील सर्वांत जास्त ५.६ लाख खटले महाराष्ट्रात तुंबले आहेत. 

- त्यापाठोपाठ अशा प्रकारच्या तुंबलेल्या खटल्यांची संख्या राजस्थानमध्ये ४.८ लाख, गुजरातमध्ये ४.४ लाख, दिल्लीत ४.१ लाख, उत्तर प्रदेशात २.७ लाख, हरयाणात २.३६ लाख, पंजाबमध्ये १.८ लाख, मध्य प्रदेशमध्ये १.७ लाख इतकी आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय